नवी दिल्ली – कर्नाटक काँग्रेस सरकारने कर वितरण आणि अनुदानात केंद्राकडून राज्यावर अन्याय केल्याचा आरोप करत दिल्लीतील आंदोलन हे शक्तीप्रदर्शन नव्हते, तर राज्यातील जनतेचा आवाज होता असे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी म्हटले आहे. हा अन्याय दूर झाला नाही तर रस्त्यावर उतरून आवाज उठवावा लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
शिवकुमार, जे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष देखील आहेत, म्हणाले की त्यांचा पक्ष संघर्ष करेल आणि कर्नाटकच्या रस्त्यावर हा मुद्दा घेऊन जाईल. सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील मंत्र्यांसह कर्नाटकातील काँग्रेस आमदार आणि खासदारांनी बुधवारी दिल्लीतील जंतरमंतर येथे निदर्शने केली आणि केंद्र सरकारने राज्याचे कथित १ लाख ८७ हजार कोटी रुपयांचे नुकसान भरून काढावे, अशी मागणी केली.ते म्हणाले की आम्ही कर्नाटकातून जो कर केंद्राला देतो त्यातून आम्हाला केवळ १३ टक्के निधी परत मिळतो. केवळ जीएसटीमध्येच नाही, प्रत्येक गोष्टीत राज्यावर अन्याय केला गेला आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, ज्या राज्यातून राज्यसभेत गेल्या आहेत, त्यांना याचे उत्तर द्यावे लागेल.वित्त आयोगाने सांगितले होते की ६००० कोटी रुपये बंगळुरूमधील जलकुंभ आणि पेरिफेरल रिंग रोडच्या विकासासाठी) द्यायचे आहेत, तेही दिले गेले नाहीत, निर्मला सीतारामन काय करत आहेत असा सवाल त्यांनी केला.
आम्हाला न्यायासाठी लढायचे आहे, आम्हाला आमचा वाटा हवा आहे, आम्हाला कर्नाटकातील लोकांची पोटे भरायची आहेत, असे सांगून ते म्हणाले, आंदोलन हा काँग्रेसचा राजकीय डाव असल्याचा भाजपचा सपशेल चुकीचा आहे.