कोपरगाव – लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वरांनी जातीपातींच्या भिंती गाडून तत्कालीन समाजव्यवस्थेला एक वेगळीच ओळख दिली होती. शोषणविरोधी, भेदभाव विरोधी, जातीभेदा विरोधी, श्रेष्ठ-कनिष्ठ विरोधी समतेची लढाई त्यांनी नुसती लढली नाही तर ती यशस्वी देखील करून दाखवली. अशा धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय व सामाजिक महान तत्वज्ञानी असणाऱ्या महात्मा बसवेश्वरांच्या विचारांची आजही जगाला गरज असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.
कोपरगाव तहसील कार्यालयात महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त आ. काळे यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवदन केले याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी तहसीलदार विजय बोरुडे, राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, अमोल राजूरकर, प्रदीप साखरे, गिरीश सोनेकर, शिवकुमार सोनेकर, रोहित सरडे, अमोल साखरे, राहुल जंगम, शिवप्रसाद घोडके, सतीश नीळकंठ, संदीप सावतडकर, दिगंबर लोहारकर हे उपस्थित होते.
याशिवाय दिगंबर भुसारे, गोपीनाथ निळकंठ, प्रमोद साखरे, किरण लड्डे, स्वाती कोयटे, मंगल सावतडकर, उज्वला सरडे, रजनी भुसारे, महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्यध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगूले, काळे कारखान्याचे संचालक दिनार कुदळे, माजी नगरसेवक विरेन बोरावके, आकाश गायकवाड, कार्तिक थोरात, लक्ष्मण सताळे आदींसह लिंगायत समाज बांधवही मोठ्या संख्येने उपस्थित होते.