नवी दिल्ली – आंध्रप्रदेशातील सत्तारूढ वायएसआर कॉंग्रेस पक्षाचे खासदार रघू रामकृष्ण राजू यांनी दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांना भारतरत्नने सन्मानित करण्याची मागणी केली. (MP Ramakrishna Raju Writes To President Droupadi Murmu, Demands Bharat Ratna For Ratan Tata) त्या मागणीचे पत्र राजू यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवले आहे.
टाटा यांनी बुधवारी 86 व्या वर्षात पदार्पण केले. टाटांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राजू यांनी त्यांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्याची मागणी केली.
Jammu and Kashmir : ट्रकमधून आलेल्या 4 दहशतवाद्यांचा सुरक्षा दलाकडून खात्मा
या पृथ्वीवर अनेक अब्जाधीश जन्मतील. पण, स्थायी स्वरूपाचा प्रभाव निर्माण करणारे टाटा यांच्यासारखे व्यक्तिमत्व विरळाच असते. परोपकारी, मानवताप्रेमी अब्जाधीशांमध्ये समावेश होणारे टाटा भारतरत्नसाठी पात्र आहेत, अशी भूमिका राजू यांनी पत्रातून मांडली आहे.