जम्मू – काश्मीरात झालेल्या चकमकीत चार दहशतवादी मारले गेले आहेत. बुधवारी पहाटे ट्रकमधून काश्मीरला जाणारे हे चार दहशतवादी सुरक्षा दलाच्या जवानांनी सापळा रचून टिपले आहेत.
जम्मू झोनचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंग यांनी सांगितले की, जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गालगतच्या सिध्रा बायपास परिसरातील तवी पुलाजवळ सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास या दहशतवाद्यांची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांना घेरले त्यावेळी ही चकमक उडाली.
दहशतवादी सशस्त्र होते त्यांना जवानांची चाहुल लागताच त्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केल्याने जवानांनाही प्रत्युत्तरात गोळीबार करावा लागला. या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
Bihar Politics : लालू आमच्याबरोबर आल्याने त्यांची CBI चौकशी – नितीशकुमार
दरम्यान, काश्मीरातील दहशतवाद्यांच्या संशयास्पद हालचालींवर काटेकोर लक्ष ठेवले जात असून गुप्तचर यंत्रणाही अधिक सक्रिय झाल्या आहेत.