T20 WorldCup 2022 – आज भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-२० विश्वचषकाचा दुसरा सेमीफायनल सामना खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय संघ पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरला मात्र सुरुवात अत्यंत खराब झाली आणि केएल राहुल ५ धावांवरच बाद झाला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माही २७ धावांवर बाद झाला.
भारतीय क्रिकेट संघातील ‘या’ अष्टपैलू खेळाडूच्या पत्नीला गुजरातमध्ये भाजपची उमेदवारी?
दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या या सामन्याअगोदर आमिर खानचा लगान चित्रपट चांगलाच चर्चेत राहिला. सोशल मीडियावर यासंबंधित मीम्स व्हायरल होऊ लागले आहेत. चाहत्यांनी भारत विरुद्ध इंग्लडच्या सामन्याचा संबंध आमिर खानच्या ‘लगान’ चित्रपटाशी लावून अनेक मीम्स तयार केले आहेत. यामध्ये भारतीय संघाच्या माजी खेळाडूंनीही पोस्ट शेअर करत लगान चित्रपटाचा उल्लेख केला आहे.
अभिनेता आमिर खानच्या लगान चित्रपटात इंग्रजांविरुद्ध दिलेला क्रिकेटचा लढा, असे चित्रीकरण दाखवण्यात आले आले. त्यामुळे आता टी-२० विश्वचषकात इंग्लंड संघ समोर असल्याने नेटकऱ्यांनी त्याचा संबंध लगान चित्रपटाशी जोडला आहे.
२००७ साली पहिल्याच टी-२० विश्वचषकाच एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर भारताला या स्पर्धेत आपले वर्चस्व सिद्ध करता आलेलं नाही. त्यामुळे भारतीय संघाला यंदाच्या हंगामातील कामगिरी पाहता विजेतेपदाचा मान मिळवण्याची चांगली संधी असणार आहे. भारताने आजच्या सामन्यात इंग्लंडचा पराभव केल्यास, फायनलमध्ये पाकिस्तानशी लढत होणार आहे.
बातमी लिहिली त्यावेळेपर्यंत भारतीय संघाची धावसंख्या १० षटकांत ६२ वर २ गडी बाद अशी आहे. सध्या विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव खरळपट्टीवर खेळता आहेत. विराट २७ धावा तर सूर्यकुमार १० धावांवर खेळत आहे. भारतीय संघाच्या डावाची सुरुवात खराब झाली होती. अगोदर केएल राहुल ५ धावा आणि नंतर रोहित शर्मा २७ धावांवर बाद झाले.