Mohammad Siraj : भारत इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात भारताने ऐतिहासिक कामगिरी करत विजय मिळवला आहे. भारताने कसोटी सामान्यातील शेवटाचा सामाना रोमांचक खेळी करत ६ धावांनी जिंकला. या सामन्यात टीम इंडियाला ३५ धावांची आवश्यता होती आणि भारताला ४ विकेट्स घायच्या होत्या. सिराजने पहिल्याच षटकापासून विकेट घेण्यास सुरुवात केली होती. परिणामी टीम इंडिया विजयी झाली. टीम इंडियाच्या विजयानंतर देशभरातून कौतुक केले जात आहे. टीम इंडियाने सामना जिंकल्यानंतर खेळाडू मोहम्मद सिराज याने मोठा खुलासा केला आहे. शेवटचा सामना खेळण्यापूर्वी त्याने गुगलकर एक शब्द लिहिलेला त्याचा फोटो डाऊनलोड केला आणि त्यामुळे सामना जिंकल्याचे त्याने सांगितलं आहे. पत्रकार परिषदेत सिराजने believe शब्द लिहिलेला फोटो त्याने त्याच्या मोबाईलवरील वॉलपेपर ठेवला होता. हा फोटो त्याने सर्वांना दाखवला आणि सामना खेळण्याच्या दिवशी सकाळी उठल्यावर नेमकं काय केलं. याबाबत सांगितलं. खरंतर शेवटच्या कसोटीत भारतला कोणत्याही परिस्थित विजयाकडे नेऊ शकेल असं त्याला वाटलं होतं. सिराजने आपली उत्तम खेळी करत इंग्लंडला गुडघे टेकण्यास भाग पाडलं आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांची मनेही जिंकली. त्याचे देखील कौतुक केले जात आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरपासून अनेक खेळाडूंनी टीम इंडिया जिंकल्यानंतर प्रतिक्रिया दिल्या आहेत. कलाविश्वातूनही टीम इंडियाचं कौतुक केलं जात आहे. मोहम्मद सिराज काय म्हणाला? “मला सुरूवातीपासून वाटत होतं की मी कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवून देऊ शकतो आणि सकाळी मी तेच केले. मी सकाळी उठलो आणि गुगलवरून Believe (विश्वास) असा लिहिलेला एक फोटो डाऊनलोड केला आणि स्वतःला म्हणालो मी हे करू शकतो. माझी एकच रणनिती होती, योग्य लाईनवर गोलंदाजी करायची” असं त्याने सांगतिलं. हेही वाचा : Dadar Kabutar khana : कबुतरखान्यांवरील कारवाईमुळे भाजपमध्येच मतभेद; फडणवीसांची महत्त्वाची बैठक, काय आहे वाद?