Water News : राज्यातील ‘या’ भागात पावसाळ्यातही पाणीटंचाई गंभीर; अवघ्या २० दिवसांत टँकरची संख्या दुप्पट
Water News : मान्सूनचे आगमन होऊनही राज्यातील मराठवाडा विभागात अपुऱ्या व असमान पावसामुळे पाणीटंचाईचे भीषण संकट निर्माण झाले आहे.

Water News : अपुऱ्या पावसामुळे मराठवाड्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरची संख्या अवघ्या २० दिवसांत दुप्पट होऊन ४७८ वर पोहोचली आहे. या विभागात आतापर्यंत सरासरी अपेक्षित पावसाच्या केवळ ७७ टक्के पाऊस झाला आहे. (Water News)
विभागीय आयुक्तांच्या कार्यालयातील अहवालानुसार, जूनपासून या आठ जिल्ह्यांमध्ये २३३.५ मिमी पाऊस झाला आहे, तर सरासरी अपेक्षित पाऊस ३०२.२ मिमी इतका आहे. गेल्या वर्षी याच दिवशी या विभागात २७९.६ मिमी पाऊस झाला होता, जो सरासरी अपेक्षित पावसाच्या ९२.५ टक्के होता. (Water News)
७ जुलै रोजी, पिण्याच्या पाण्यासाठी १०३ गावे आणि ८४ वस्त्या २०० टँकरवर अवलंबून होत्या. अवघ्या २० दिवसांत हा आकडा दुप्पट झाला असून, आता मराठवाड्यातील २५७ गावे आणि १३० वस्त्यांमध्ये ४२८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. (Water News)
Nashik Rain : नाशिकमध्ये पावसाचा हाहाकार! गोदावरीच्या पुरात अडकलेल्या वयोवृद्ध पर्यटकाची थरारक सुटका
मराठवाड्यातील जिल्हा प्रशासनाने गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी आणि टँकर्स भरण्यासाठी ८८७ विहिरी ताब्यात घेतल्या होत्या. पावसाचे प्रमाण कमी आणि असमान असल्याने ताब्यात घेतलेल्या विहिरींची संख्याही आता जवळपास १,००० वर पोहोचली आहे. (Water News)
सध्या प्रशासनाकडे ९८७ विहिरी उपलब्ध आहेत. एकूण ४२८ टँकरपैकी २२४ टँकर केवळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तैनात आहेत. त्यानंतर जालना (१०८), बीड (७१), नांदेड (१५), धाराशिव (८) आणि लातूर व हिंगोली (प्रत्येकी १) या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. (Water News)
परभणी जिल्ह्यात अद्याप एकही टँकर तैनात करण्यात आलेला नाही. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे २०७ विहिरी ताब्यात घेण्यात आल्या आहेत, असे अहवालात नमूद केले आहे. (Water News)
Koynanagar News : कोयना धरणाच्या सहा वक्र दरवाजांना पाणी टेकले; साठा ७२.६१ टीएमसीवर
Pimpri News: अकरा जणांना डेंग्यूची लागण २७ हजार रुग्णांना हिवताप






