Maharashtra Politics : शिवसेनेत फूट पडल्यापासून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात सार्वजनिकरीत्या (Maharashtra Politics) तीव्र राजकीय शत्रुत्व दिसून येत आहे. दोन्ही नेते एकमेकांवर बेछूट आरोप-प्रत्यारोप करताना दिसतात. विधानसभा निवडणुकीतही दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात उमेदवार उभे केले होते. मात्र, या सगळ्या राजकीय विरोधाभासांमागे प्रत्यक्षात दोघेही एकमेकांच्या जवळ आहेत, असा धक्कादायक आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केला आहे. रविकांत तुपकर हे सध्या वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी राज्यातील राजकीय घडामोडी आणि शेतकऱ्यांच्या विविध मुद्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोठे विधान केले. “उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकांशी कितीही भांडत असले तरी दिल्लीत एकाच ताटात काला करून खातात”, असा खळबळजनक आरोप रविकांत तुपकर यांनी वाशिम येथून केला. ते पुढे म्हणाले, “वेगवेगळ्या पक्षाचे आमदार मुंबईत एका ताटात बसून खातात, मी जवळून पाहिले आहे. तसेच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे किती भांडतात, पण दिल्लीत एकाच ताटात जेवतात.” (Maharashtra Politics) Maharashtra Politics : उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात; ‘या’ नेत्याचा खळबळजनक आरोप हे वक्तव्य त्यांनी आडोळी (ता. वाशिम) येथे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनस्थळी दिले. गावातील शेतकऱ्यांनी ‘गाव विक्रीला काढले’ आणि ठिय्या आंदोलन केले होते. हे आंदोलन सलग ११ दिवस चालल्यानंतरही प्रशासनाने दखल न घेतल्याने शेतकरी सतीश इढोळे यांनी ११ एप्रिलपासून आमरण उपोषण सुरू केले होते. (Maharashtra Politics) शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शुक्रवारी (१७ एप्रिल) या आंदोलनाला भेट दिली आणि सतीश इढोळे यांचे आमरण उपोषण सोडवले. उपोषणस्थळी शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी राजकीय नेत्यांवर हे टीकात्मक विधान केले. तुपकर यांच्या या आरोपाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना (ठाकरे गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील सततच्या सार्वजनिक भांडणांच्या पार्श्वभूमीवर हे विधान अधिक चर्चिले जात आहे. (Maharashtra Politics) सध्या राज्यात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आंदोलने सुरू असताना, राजकीय नेत्यांच्या ‘द्वैत’ वर्तनाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न रविकांत तुपकर यांनी केला आहे. पुढील काही दिवसांत या विधानावर दोन्ही शिवसेना गटांकडून काय प्रतिक्रिया येतात, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.