Karad News : चिंता वाढली..! महाराष्ट्राची ‘भाग्यलक्ष्मी’ आटली; कोयना धरणात अवघा 10 टीएमसी पाणीसाठा; वीजनिर्मिती बंद
Karad News : महाराष्ट्राची 'भाग्यलक्ष्मी' आणि वरदायिनी मानल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यातील कोयना धरणातून एक अत्यंत चिंताजनक बातमी समोर आली आहे.

Karad News : कोयना धरणाचा शिवसागर जलाशय कोरडा ठाक पडत चालला असून पाऊसकाळ लांबल्यास सिंचनासह वीजनिर्मितीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. कोयना धरणाच्या नवीन तांत्रिक वर्षाला आजपासून म्हणजेच १ जूनपासून प्रारंभ झाला आहे. (Karad News)
या पार्श्वभूमीवर कोयना धरणावर पूर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्राची वरदायिनी असलेल्या कोयना धरणात 10 टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. पायथा वीजगृहातून 22 ऑक्टोबर 2025 पासून सुरू असलेला पुर्वेकडील विसर्ग आता पूर्णतः बंद करण्यात आला आहे. (Karad News)
तसेच पाणी कोटा संपल्याने वीजनिर्मिती बंद झाली आहे. कोयना धरणात सध्या 10 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. 1 जून 2025 ते 30 मे 2026 पर्यंत 67.57 टीएमसी पाण्याचा वापर वीजनिर्मितीसाठी करण्यात आला आहे. (Karad News)
सांगली पाटबंधारे विभागाच्या मागणीनुसार पूर्वेकडील सिंचनासाठी पायथा विद्युतगृहातून 33.10 टीएमसी आणि विमोचकामधून 6.91 टीएमसी, असा एकूण 40.1 टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. कोयना धरणात अत्यल्प पाणीसाठा असल्याने पूर्वेकडील सिंचनासाठीच्या पाण्याचा विसर्ग सध्या पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. (Karad News)





