AAP VS Bjp : आम आदमी पक्षाच्या वरीष्ठ नेत्या आणि दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनी मंगळवारी दावा केला की भाजपमध्ये प्रवेश करावा अन्यथा एका महिन्याच्या आत अंमलबजावणी संचालनालयाकडून अटक करण्याची तयारी ठेवा असा निरोप आपल्याला भाजपकडून देण्यात आला आहे. आतिशी यांनी आज एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्या म्हणाल्या की आपल्याशी जवळीक असलेल्या एका व्यक्ती मार्फत भाजपने हा निरोप आपल्याला पाठवला आहे.
पत्रकार परिषदेत आतिशी यांनी दावा केला की आपल्या खेरीज आम आदमी पक्षाचे आणखी तीन तीन नेते – दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज, आमदार दुर्गेश पाठक आणि राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांनाही पुढील दोन महिन्याच्या आत अटक करण्याचा इशारा भाजपकडून देण्यात आला आहे. | AAP VS Bjp
आतिशी यांनी दावा दावा केला की आपल्याला सांगण्यात आले होते की येत्या काही दिवसांत ईडी आपल्या निवासस्थानावर आणि आपल्या नातेवाईकांच्या घरी छापे टाकेल. त्या म्हणाल्या की रविवारी दिल्लीत झालेल्या इंडिया आघाडीच्या रामलीला मैदानावरील रॅलीच्या यशामुळे भाजप हादरला आहे. त्यांना वाटले होते की दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात पाठवल्याने आपचे विघटन होईल, पण आम आदमी पक्ष मजबुतीने उभा असल्याने भाजपने पुन्हा आमच्या एकूण चार जणांना अटक करण्याचा घाट घातला आहे. | AAP VS Bjp
भाजप आमच्या आमदारांची शिकार करून आणि पक्ष फोडून दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करू इच्छित असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ‘आप’चे किरारीचे आमदार ऋतुराज झा यांनी दावा केला आहे की त्यांना भाजपमध्ये सामील होण्यासाठी २५ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. | AAP VS Bjp
“अशोक चव्हाण यांचा काँग्रेस संपवण्याचा प्लॅन होता..” बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ