नवी दिल्ली – अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीच्या मुद्द्यावरून बुधवारी लोकसभेत गदारोळ झाला. कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि खासदार सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस लोकसभा खासदार आणि तृणमूल कॉंग्रेसच्या खासदारांनी सभात्याग केला.
भारत-चीन सीमा मुद्द्यावर चर्चेची मागणी विरोधक करत होते. बुधवारी प्रश्नोत्तराचा तास संपताच कॉंग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी भारत-चीन सीमा परिस्थितीवर चर्चेची मागणी केली.
अधीर रंजन चौधरी म्हणाले की, माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1962मध्ये लोकसभेत भारत-चीन युद्धावर चर्चा करण्यास परवानगी दिली होती. 1962मध्ये जेव्हा भारत-चीन युद्ध सुरू झाले तेव्हा जवाहरलाल नेहरूंनी 165 खासदारांना या सभागृहात बोलण्याची संधी दिली. यानंतर आपण काय करायचे ते ठरले.
यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, व्यवसाय सल्लागार समितीच्या बैठकीत यावर निर्णय घेतला जाईल. ओम बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज सुरू होताच, कॉंग्रेस आणि टीएमसीने निषेधार्थ सभात्याग केला आणि भारत-चीन सीमा मुद्द्यावर चर्चा होऊ न दिल्याचा आरोप सरकारवर केला.
TMC : राष्ट्रवादीच्या माजी खासदाराचा ‘तृणमूल कॉंग्रेस’मध्ये प्रवेश; काही दिवसांपूर्वीच…
टीएमसी खासदार सुदीप बंदोपाध्याय यांनीही सभागृहात चर्चेची मागणी केली आणि म्हणाले की, त्यांच्या पक्षाचे सदस्य सरकारच्या वृत्तीच्या निषेधार्थ सभात्याग करत आहेत.