FIFA World Cup 2026 qualifiers (India vs Kuwait) :- भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री गुरुवारी भारतीय संघाचे नेतृत्व करण्यासाठी शेवटचा मैदानात उतरणार आहे. फिफा विश्वकरंडक पात्रता फेरीत भारताचा सामना कुवेतशी होणार आहे. संघातील खेळाडू आपल्या कर्णधाराला विजयासह अलविदा करण्याचा प्रयत्न करतील. हा सामना भारतीय संघासाठी करा किंवा मरो सारखा आहे. जर भारताने हा सामना जिंकला तर प्रथमच 18 संघांच्या पात्रता फेरीच्या अंतिम टप्प्यासाठी पात्र होण्यासाठी तो अधिक चांगल्या स्थितीत असेल. भारताच्या महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या छेत्रीने नुकतीच फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली होती आणि त्याने 6 जून रोजी कुवेतविरुद्ध भारताकडून शेवटचा सामना खेळणार असल्याचे सांगितले होते. छेत्री गेली 19 वर्षे भारतीय फुटबॉलचा ध्वजवाहक आहे आणि 39 वर्षीय खेळाडू संघासाठी आपले सर्वस्व द्यायला तयार असेल. प्रत्येकी चार संघांच्या नऊ गटांतील अव्वल दोन संघ पात्रतेच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश करतील. फिफाने विश्वकरंडक स्पर्धेत आशियाचा कोटा आठ बर्थने वाढवला असून विजेते तिसऱ्या टप्प्यानंतरच ठरवले जातील. छेत्रीने 150 सामन्यांमध्ये 94 गोल केले आहेत आणि सक्रिय खेळाडूंमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्यांच्या यादीत क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लिओन मेस्सी यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. Virat Kohli : ‘कोहली’चे आणखी एक ‘विराट’ यश, ‘या’ बाबतीत ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमार जूनियरला टाकलं मागे… भारत आहे दुसऱ्या स्थानावर… भारत अ गटात चार सामन्यांतून चार गुणांसह कतारच्या (१२ गुण) मागे दुसऱ्या स्थानावर आहे. अफगाणिस्तान तिसऱ्या स्थानावर असून गोल फरकाने मागे आहे. कुवेत तीन गुणांसह शेवटच्या स्थानावर आहे. भारतीय संघ कुवेतचा पराभव करण्यात यशस्वी ठरल्यास अफगाणिस्तानवर आघाडी घेऊ शकतो. गुरुवारीच अफगाणिस्तानचा कतारशी सामना होणार आहे. गोल फरकाच्या बाबतीत अफगाणिस्तान भारतापेक्षा सात गोलांनी मागे आहे आणि भारताच्या विजयानंतर हे अंतर भरून काढणे त्यांच्यासाठी खूप कठीण जाईल.