IND vs SL Test : यशस्वी-फर्नांडोनंतर ‘या’ खेळाडूवर ICCची मोठी कारवाई; ‘ती’ चूक पडली महागात
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात (IND vs SL Test) खेळाडूंच्या आक्रमकतेमुळे मैदानावर चांगलाच तणाव पाहायला मिळत आहे.

IND vs SL Test : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात (IND vs SL Test) खेळाडूंच्या आक्रमकतेमुळे मैदानावर चांगलाच तणाव पाहायला मिळत आहे. सामन्याच्या सुरुवातीला यशस्वी जैस्वाल आणि असिथा फर्नांडो यांच्यातील वादाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
या प्रकरणात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (IND vs SL Test) दोघांवर दंडात्मक कारवाई केली होती. मात्र, हा वाद इथेच थांबला नाही. आता आयसीसीने श्रीलंकेच्या आणखी एका खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई करत त्याला डिमेरिट पॉईंट दिला आहे.
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने आपला पहिला डाव घोषित केल्यानंतर श्रीलंकेला दिवसाच्या अखेरच्या काही षटकांत फलंदाजीला उतरावे लागले. अवघ्या एका धावेवर पहिली विकेट गमावल्यामुळे श्रीलंकेने प्रभात जयसूर्याला नाईट वॉचमन म्हणून मैदानात पाठवले. परंतु, अवघ्या २ धावा करून तो बाद झाला.
स्वस्तात माघारी परतल्याचा संताप प्रभातला अनावर झाला आणि पॅव्हेलियनमध्ये परतत असताना त्याने सीमारेषेजवळ आपली बॅट जोरात आपटली. आयसीसीच्या आचारसंहितेतील कलम २.२ (खेळाचे साहित्य, कपडे किंवा मैदानातील उपकरणांचा गैरवापर) अंतर्गत हे वर्तन नियमांचे उल्लंघन ठरले. जयसूर्याने चूक मान्य केल्याने आयसीसीने त्याच्यावर अधिकृत कारवाई करत डिमेरिट पॉईंट दिला.
दरम्यान, सामन्यात भारतीय संघाने (IND vs SL Test) मजबूत पकड मिळवली आहे. पहिल्या डावात देवदत्त पडिक्कल (११७) आणि ध्रुव जुरेल (नाबाद ११५) यांच्या शतकी खेळींच्या जोरावर भारताने ९ बाद ५०३ धावांवर डाव घोषित केला.
या डावात कर्णधार शुबमन गिल (५०), ऋषभ पंत (६३), यशस्वी जैस्वाल (४५) आणि रवींद्र जडेजा (४३) यांनीही उपयुक्त योगदान दिले. प्रत्युत्तरात फलंदाजी करताना श्रीलंकेच्या संघाने दुसऱ्या डावात ८ गडी गमावून २६५ धावा केल्या आहेत.






