IND Vs PAK : आयसीसी पुरुष टी20 वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारत आणि पाकिस्तान (IND Vs PAK) यांच्यातील हायव्होल्टेज सामना होणार नसल्याची मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तान सरकारने १ फेब्रुवारी २०२६ रोजी अधिकृत घोषणा करून आपल्या क्रिकेट (IND Vs PAK) संघाला स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी दिली, पण १५ फेब्रुवारीला कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये होणारा भारताविरुद्धचा ग्रुप स्टेज सामना बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांना हा महत्त्वाचा सामना पाहण्याची संधी मिळणार नाही. बहिष्काराचं कारण अस्पष्ट पाकिस्तान सरकारने या बहिष्काराचं स्पष्ट कारण सांगितलं नाही. मात्र, पाकिस्तानी मीडिया आणि काही रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानने एक अट ठेवली आहे – बांगलादेशला स्पर्धेत परत आणलं आणि त्यांचे सामने श्रीलंकेत खेळवले गेले तरच ते भारताविरुद्ध खेळतील. बांगलादेशने सुरक्षेच्या कारणास्तव भारतात सामने न खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी आयसीसीकडे आपले सामने श्रीलंकेत हलवण्याची विनंती केली होती, पण आयसीसीने ही विनंती फेटाळली आणि भारतातच खेळावे लागतील असं ठाम सांगितलं. पाकिस्तानचा टी-२० वर्ल्ड कप २०२६ मधील भारत सामन्यावर बहिष्कार बांगलादेशची स्पर्धेतून माघार टी20 वर्ल्ड कप २०२६ भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त आयोजनात होत आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) भारतातील सुरक्षेच्या चिंतेमुळे सामने श्रीलंकेत हलवण्याची मागणी केली. बीसीबीच्या या निर्णयामागे आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान याची हकालपट्टी केल्याचा घटनाही कारणीभूत ठरली. आयसीसीने बांगलादेशच्या विनंतीला नकार दिल्यानंतर बांगलादेशने स्पर्धेतून माघार घेतली. त्यानंतर आयसीसीने बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडचा समावेश केला. पाकिस्तानवर आर्थिक आणि राजकीय दबाव पाकिस्तान आर्थिक संकटातून जात असताना हा निर्णय घेतला आहे. टी20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी संघांना आयसीसीकडून प्रत्येक सामन्यासाठी मानधन मिळतं, जिंकल्यास अतिरिक्त रक्कम मिळते. स्पॉन्सरशिप, ब्रॉडकास्टिंग राइट्स आणि इतर माध्यमांतूनही कमाई होते. विशेषतः भारत-पाकिस्तान सामन्यातून होणारी कमाई काही हजार कोटींच्या घरात असते. या एका सामन्याच्या बहिष्कारामुळे पाकिस्तानला आणि आयसीसीलाही मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागणार आहे. क्रिकेट विश्वातून पाकिस्तानच्या या निर्णयावर जोरदार टीका होत आहे. आयसीसीनेही “selective participation” ला विरोध दर्शवत दीर्घकालीन परिणामांची चेतावणी दिली आहे. पाकिस्तान निर्णय मागे घेणार? पाकिस्तानने इतर क्रिकेट बोर्डांशी संपर्क साधला, पण त्यांना कोणताही पाठिंबा मिळाला नाही. आर्थिक तोटा, भविष्यातील आयसीसी संबंध आणि क्रिकेट विश्वातील अलग पडण्याची भीती पाहता पाकिस्तान हा निर्णय मागे घेऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अद्याप अधिकृत अपडेट नाही. पाकिस्तान संघ कोलंबोला पोहोचला असून, इतर सामन्यांसाठी तयारी करत आहे. हे पण वाचा : Share Market: शेअर बाजारात 8 महिन्यांतील सर्वात मोठी उसळी; गुंतवणूकदारांनी एकाच दिवसात कमावले ₹12 लाख कोटी