IND vs ENG Test Series : श्रेयस अय्यर कसोटी मालिकेतून बाहेर? राजकोट कसोटीपूर्वी भारताच्या समस्या वाढल्या…

राजकोट :– टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतून बाहेर होऊ शकतो. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाठीत जडपणाच्या तक्रारीनंतर श्रेयस अय्यर इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये राजकोट कसोटीला मुकण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने(एनसीए) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) त्याच्या फिटनेस स्थितीबद्दल माहिती दिली आहे. तिसरी कसोटी १५ फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये खेळवली जाणार आहे. पाच सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत आहे.
तिसऱ्या कसोटीसाठी आणि त्यापुढील संघाची घोषणा अद्याप झालेली नाही. निवडकर्त्यांना बैठकीसाठी बोलावण्यात आल्याची पुष्टी एका सूत्राने केली आहे. गुरुवारी निवड समितीची बैठक होणे अपेक्षित होते, मात्र ते होऊ शकले नाही. तसेच शुक्रवारी उशिरापर्यंत ही बैठक होऊ शकलेली नाही. या बैठकीनंतर संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाही राजकोट येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटीतून बाहेर जाऊ शकतो. दुखापतीमुळे तो दुसरी कसोटी खेळू शकला नाही, त्याच्या जागी कुलदीप यादवचा प्लेइंग-११ मध्ये समावेश करण्यात आला होता. तसेच, केएल राहुलही दुसऱ्या कसोटीत खेळू शकला नाही, तोही दुखापतीमुळे बाहेर आहे. याशिवाय विराट कोहली आणि मोहम्मद शमी हे देखील या मालिकेसाठी उपलब्ध नाहीत.
कोहलीचे खेळणेही अनिश्चित
पहिल्या दोन कसोटींमधून बाहेर पडलेल्या अनुभवी विराट कोहलीबाबत बीसीसीआयने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. वैयक्तिक कारणांमुळे तो २ कसोटी खेळू शकला नाही. मालिकेतील उर्वरित सामन्यांमध्येही त्याचा सहभाग निश्चित झालेला नाही. परंतू राहुल मात्र लवकरच तंदुरुस्त होण्याची शक्यता आहे. राहुलची दुखापत लक्षात घेऊन बीसीसीआयने त्याला बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पाठवले. रवींद्र जडेजाही येथे आहे. राहुलने पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात 86 धावा केल्या होत्या.
IND vs ENG Test Series : इशान किशनवर माजी क्रिकेटपटू संतापला, म्हणाला “त्याचं पुनरागमन…”
अय्यरची कामगिरी….
हैदराबाद आणि विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या दोन कसोटीत अय्यरने 35, 13, 27, 29 धावा केल्या होत्या. या खराब कामगिरीनंतर त्याच्यावर बरीच टीका होत होती. त्यामुळे उर्वरित 3 सामन्यांमध्ये त्याला संधी मिळणार नाही, अशी चर्चा होती.
IND Vs ENG 3rd Test : जसप्रीत बुमराहला मिळणार ब्रेक, संघात ‘या’ खेळाडूला मिळणार संधी….
याआधी, दुखापतीतून सावरल्यानंतर श्रेयस अय्यरने चांगले पुनरागमन केले होते आणि विश्वचषकात शैलीदार फलंदाजी करताना 530 धावा केल्या. अय्यरने मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करणे सुरूच ठेवले होते, परंतु कसोटी फॉरमॅटमध्ये त्याचा फॉर्म काही काळापासून घसरला आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरही त्याला दोन कसोटी सामन्यांमध्ये विशेष काही करता आले नव्हते.





