BCCI announces Virat Kohli’s replacement for the first two Tests against England : बीसीसीआयने 25 जानेवारीपासून इंग्लंडविरुद्ध सुरू होणाऱ्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी विराट कोहलीच्या जागी बदली खेळाडूच्या नावाची घोषणा केली आहे. इंग्लंडविरुद्ध होत असलेल्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांतून स्टार फलंदाज विराट कोहलीने माघार घेतल्याने त्याच्या जागी नवोदित रजत पाटीदार या खेळाडूचा संघात समावेश करण्यात आला आहे.
विराट कोहली वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या दोन कसोटीत खेळण्यासाठी उपलब्ध नाही. विराट कोहलीची जागा घेण्याच्या शर्यतीत सरफराज खानचेही नाव होते. मात्र सर्फराज खान सध्या भारत अ संघाशी संबंधित राहील. त्याचवेळी रणजी स्पर्धेत संमिश्र कामगिरी करणारा चेतेश्वर पुजाराकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे.
रजत पाटीदार चांगलाच भरात असून नुकतीच त्याने भारत अ संघाकडून खेळताना इंग्लंड लायन्सविरुद्धच्या अनधिकृत कसोटी सामन्यात १५१ धावांची खेळी केली होती. या खेळीत त्याने १५८ चेंडूत १९ चौकार आणि ५ षटकार फटकावले होते. तो भरात असल्यामुळेच कोहलीच्या जागी त्याची संघात वर्णी लागली आहे.
रजतची रणजीमध्ये उत्कृष्ट कामगिरी…
रजतने 2022-2023 रणजी हंगामातील 7 सामन्यांच्या 12 डावांमध्ये 47.08 च्या सरासरीने 565 धावा केल्या, ज्या दरम्यान त्याने 1 शतक आणि 6 अर्धशतके केली. 2021-22 हंगामात, त्याने फक्त 6 सामन्यांच्या 9 डावात 658 धावा केल्या, ज्या दरम्यान त्याची सरासरी 82.25 होती. या काळात त्याने आपल्या बॅटने 2 शतके आणि 5 अर्धशतकेही झळकावली.
रजत पाटीदार यांची कारकीर्द
प्रथम श्रेणी : 55 सामने, 4000 धावा, 45.97 सरासरी, 12 शतके, 22 अर्धशतके
लिस्ट ए : 58 सामने, 1985 धावा, 36.09 सरासरी, 3 शतके, 12 अर्धशतके
T20 : 50 सामने, 1640 धावा, 37.27 सरासरी, 1 शतक, 14 अर्धशतके
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचे वेळापत्रक
पहिली कसोटी : २५-२९ जानेवारी, हैदराबाद
दुसरी कसोटी : २-६ फेब्रुवारी, विशाखापट्टणम
तिसरी कसोटी : १५-१९ फेब्रुवारी, राजकोट
चौथी कसोटी : २३-२७ फेब्रुवारी, रांची
पाचवी कसोटी : ७-११ मार्च, धर्मशाला
पुजारा आणि रहाणेवर ब्रेक, सर्फराजची पहावी लागणार वाट…
पाटीदारची टीम इंडियात निवड म्हणजे सध्या चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांची कारकीर्द थांबली आहे, तर मुंबईचा फलंदाज सरफराज खानची प्रतीक्षा आता थोडी लांबली आहे. सरफराज खानने देशांतर्गत क्रिकेटमध्ये गेल्या दोन रणजी हंगामात आपल्या बॅटने खळबळ उडवून दिली होती. यापूर्वी, रिंकू सिंगचा इंग्लंड लायन्सविरुद्धच्या दुसऱ्या बहु-दिवसीय सामन्यासाठी भारत अ संघात समावेश करण्यात आला होता, ज्यामुळे पाटीदारला टीम इंडियामध्ये सामील होण्याचा मार्ग मोकळा झाला होता.
पुजाराने रणजी ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट फॉर्म दाखवला असून अलीकडेच त्याने द्विशतक झळकावले आहे. पण आता पुजारासाठी टीम इंडियाचे दरवाजे जवळपास बंद झाले आहेत. तर अजिंक्य रहाणेला रणजी ट्रॉफीमध्येही चांगली कामगिरी करता आलेला नाही. त्यामुळे त्याचे पुनरागमन होण्याची शक्यता नाही.