ढाका – भारत आणि बांगलादेश ( IND vs BAN ) यांच्यात आजपासून दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. सामान्यांच्या सुरवातीला बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघात वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट याला संधी देण्यात आली. पहिल्यांदा गोलंदाजी करताना टीम इंडियाने बांगलादेश संघावर चांगले वर्चस्व गाजवले. त्यामुळे यजमान संघ अवघ्या २२७ धावांवरच सर्वबाद झाला.
#LionelMessi | मेस्सी आता नोटांवर झळकणार; सरकार घेणार मोठा निर्णय
बांगलादेश संघाकडून मोमिनुल हक याने सर्वाधिक ८४ धावांची खेळी केली. त्याच्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. भारतीय संघाकडून उमेश यादव आणि रविचंद्रन अश्विनने यांनी दमदार कामगिरी केली. त्यांनी दोघांनीही प्रत्येकी ४-४ फलंदाजांना बाद केले. त्याचबरोबर मोठ्या कालावधीनंतर संघात पुनरागमन केलेल्या जयदेव उनाडकटने २ गड्यांना बाद केले.
#LionelMessi | मेस्सी आता नोटांवर झळकणार; सरकार घेणार मोठा निर्णय
बांगलादेशने दिलेल्या २२७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघ बिनबाद १९ धावांवर आहे. दुखापतीमुळे खेळणार की नाही अशी शंका असलेल्या केएल राहुलने शुबमन गिलसह डावाची सुरुवात केली. गिल १४ धावा तर केएल राहुल ३ धावांवर खेळत आहेत. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी भारतीय संघाला या सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवणे आवश्यक असणार आहे.
It’s Stumps on Day 1️⃣ of the second #BANvIND Test!#TeamIndia move to 19/0, trail by 208 runs.
Scorecard – https://t.co/XZOGpedIqj pic.twitter.com/dyeBicJ4Xh
— BCCI (@BCCI) December 22, 2022