Manoj jarange : “मराठे चवताळले तर तुम्हाला हाताखालून काढतील…”; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
‘सध्या उंटावरून शेळ्या हाकण्याचं काम सुरू आहे. आम्ही सांगितलं आहे की संपूर्ण मसुद्याची अंमलबजावणी करा,’ असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

Manoj jarange : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असून आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे. जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या या आंदोलनादरम्यान गेल्या दोन-तीन दिवसांपासून जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असल्याचं सांगितलं जात आहे.
अशातच काल सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांची भेट घेत मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचं सांगितलं. मात्र, प्रत्यक्षात मागण्यांच्या अंमलबजावणीला सुरुवात झालेली नसल्याने जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. (Manoj jarange)
जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या प्रमाणपत्रांचं तातडीने वाटप सुरू करण्याची मागणी केली आहे. ‘58 लाख नोंदींच्या आधारे आजपासूनच जात प्रमाणपत्रांचं वाटप सुरू करा’, अशी मागणी त्यांनी केली. (Manoj jarange)
तसेच सातारा आणि कोल्हापूर संस्थानचे जीआर काढावेत आणि हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र वाटप सुरू करावं, अशीही भूमिका त्यांनी मांडली.
यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘सध्या उंटावरून शेळ्या हाकण्याचं काम सुरू आहे. आम्ही सांगितलं आहे की संपूर्ण मसुद्याची अंमलबजावणी करा,’ असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
रद्द केलेली चार प्रमाणपत्रं वैध करून द्यावीत, ईबीसीसीमधून नियुक्त्या झालेल्या मुलांना नियुक्त्या द्याव्यात, तसेच सारथी आणि महामंडळाचे परतावे द्यावेत, अशा विविध मागण्या त्यांनी केल्या आहेत.
‘माणूस बेशुद्ध पडण्याची वाट पाहता का?’ (Manoj jarange)
सरकारच्या शिष्टमंडळाकडून मसुदा वाचला का आणि तो मान्य आहे का, असा प्रश्न विचारण्यात आल्यावर जरांगे पाटील संतापले. ‘मी मसुदा वाचला नाही. तुम्ही माणसाची तब्येत खराब होण्याची वाट पाहा.
माणसं बेशुद्ध पडल्यानंतर येणार आणि मसुदा वाचला का असं विचारणार?’ अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी सरकारला स्पष्ट शब्दांत इशारा देत ‘मराठे चवताळले तर तुम्हाला हाताखालून काढतील. मुंबईतही हेच होईल,’ असं म्हटलं.
‘सरकार मराठ्यांना फसवणार’ (Manoj jarange)
मनोज जरांगे यांनी सरकार मराठा समाजासोबतच ओबीसी समाजालाही फसवत असल्याचा आरोप केला. ‘सरकार मराठ्यांना फसवणार आहे. हे मराठ्यांसह ओबीसींना फसवत आहेत.
आपण सगळ्या जाती मिळून यांना कुटून काढू, आंदोलनादरम्यान कोणालाही हात न लावण्याचं आवाहनही त्यांनी केलं. दंगल घडवण्याचा प्रयत्न झाल्यास आपण उपोषण सोडून देऊ, असा इशाराही त्यांनी दिला.
जरांगे पाटील यांनी सरकारकडे आधी चार प्रमाणपत्रांची मागणी पूर्ण करण्याचा आग्रह धरला. कोल्हापूर आणि सातारा संस्थानचा मसुदा अद्याप देण्यात आलेला नसल्याचं सांगत त्यांनी यावरही सरकारला धारेवर धरलं.
‘तुम्ही चुकीचे जीआर आणा. काही चुकलं तर सुधारित जीआर काढा. तुम्ही कॅम्प लावला तर काढा ना मग! गावागावात प्रमाणपत्र वाटप सुरू करा,’ असं जरांगे पाटील म्हणाले.
शिंदे, विखे आणि सावंत यांच्यावरही भाष्य (Manoj jarange)
यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या राजकारणावर भाष्य करत ‘त्यांच्या राजकारणाशी आपल्याला काहीही घेणं-देणं नाही,’ अशी भूमिका घेतली. तर विखे आणि सावंत यांच्या भूमिकेवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
‘चांगला रिस्पॉन्स म्हणजे काय? त्यांना गोळ्या सुरू आहेत का? ते मराठ्यांचा अवमान करायला लागले. तुम्हाला यायचं असेल तर सगळे जीआर काढून या; अन्यथा येऊ नका,’ असं त्यांनी सुनावलं.
विखे यांच्यावर टीका करताना ‘तुम्ही आमच्या नोंदी कमी केल्या. लोकांचं धुणं धुवू नका. आता तू शिफारस कर; कुणाकडे बोटं दाखवू नको,’ असंही जरांगे पाटील म्हणाले.
दरम्यान, ‘मी पण आता मुंबईला जायला सज्ज होतो. उपोषण मी सोडणार नाही,’ असं स्पष्ट करत मनोज जरांगे पाटील यांनी आपला लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.






