Mehboob Shaikh : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मेहबूब शेख यांनी विधानसभा निवडणुकीआधी धनंजय मुंडेंचे विरोधक बबन गित्ते यांना कसं गुंतवता येईल? याचं परफेक्ट प्लॅनिंग करून परळीतील सरपंच बापू अंधाळेचा बळी देण्यात आल्याचा मोठा दावा केला आहे. महादेव मुंडे यांचे मारेकरी 21 महिन्यापासून मोकाटच आहेत. याच मुद्यावर बोट ठेवत महबूब शेख यांनी भाष्य केलं आहे. फरार आरोपी गोट्या गित्तेचा पुरवणी जबाब घेऊन वेळ बदलण्यात आल्याचे देखील ते म्हणाले आहेत. पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत पदभार घेण्यापूर्वी सर्व पोलीस यंत्रणा तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड याचे घरगडी असल्यासारखं काम करत असल्याचा आरोपही शेख यांनी केला आहे. त्याचा त्रास आम्हा सर्वांना भोगावा लागल्याचे ते म्हणाले. कुमावत यांची नियुक्ती राज्य सरकारने महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना केली आहे. यासाठी राज्य सरकारकडून एसआयटी प्रमुख म्हणून पोलीस अधिकारी पंकज कुमावत यांची नियुक्त करण्यात आली आहे. कुमावत यांनी सोमवारी परळी येथे दाखल होत तहसील समोरील मैदानात असलेल्या घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी संपूर्ण घटनाक्रम समजून घेतला आहे. यामुळे या खून प्रकरणाच्या तपासाला वेग येणार आहे. धनंजय मुंडेवर साधला निशाणा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अजून ‘सातपुडा’ हा सरकारी बंगला सोडलेला नाही. या प्रकरणी आता चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर मेहबूब शेख यांनी भाष्य करत टीका केली आहे. धनंजय मुंडे यांचा शासकीय बंगल्यात जीव गुंतला आहे. त्यांना वाटत असेल मी पुन्हा येईल.. असा निशाणा त्यांनी धनंजय मुंडेवर साधला. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा होण्यासाठी देव पाण्यात ठेवून कार्यकर्ते बसले होते. मुख्यमंत्री अथवा अजित दादांनी त्यांना बंगला सोडू नये, असं सांगितले असेल अशी प्रतिक्रिया मेहबूब शेख यांनी दिली आहे. हेही वाचा : घटस्फोटानंतर धनुषच्या मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रंगल्या डेटिंगच्या चर्चा