अवतरली गाडग्यां घडां । पृथ्वी अनोळख जाली मूढां । वन्हि जाला कानडा । दीपत्वासाठीं ।। अज्ञानी मनुष्याला
मातीपासून केलेली मडकी दाखविली असता त्यास मूळ मातीची ओळख नसते अथवा दिवा पाहिला असता अग्नीची ओळख नसते, मूर्ख मनुष्याला वस्त्र दाखविले असता तंतूंची ओळख पटत नाही,
त्यास पडद्यावरील चित्रे दाखविली असता पडद्याची ओळख नसते, तसे भूतमात्र भिन्नभिन्न आहे या समजुतीने ज्या ज्ञानाची ऐक्यबोधाची भावना नाश पावली आहे.
मग लाकडे पेटल्यावर त्यांचे आकारांप्रमाणे अग्नी निरनिराळा आहे,
फुलांवरून वास निराळे आहेत, चंद्राचे प्रतिबिंब पाण्यात पडल्यामुळे ते हालल्यावर चंद्राचे तुकडे झाले आहेत, तसा नानाप्रकारच्या पदार्थात पुष्कळ भिन्नपणा आहे. वेषावरून लहान व मोठा हा भेद आहे, या समजुतीने जे भरलेले ज्ञान, ते राजस ज्ञान होय.