IPL 2024, Ambati Rayudu on RCB’s Performance : – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) गेल्या 16 वर्षांपासून पहिल्या आयपीएल वितेपदाची वाट पाहत आहे. फाफ डूप्लेसिच्या नेतृत्वाखालील आरसीबीने आयपीएलच्या 17 व्या हंगामात पहिल्या 4 पैकी 3 सामने गमावले आहेत. या संघावर सर्वत्र टीका होत आहे. स्टार्सने जडलेल्या या संघात विराट कोहली, डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेलसारखे महान फलंदाज आहेत, तरीही संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आता चेन्न्ई सुपर किंग्जचा माजी खेळाडू व समालोचक अंबाती रायुडूने आरसीबीच्या वरिष्ठ फलंदाजांवर सडकून टीका केली आहे.
याआधीही आरसीबी संघात अनेक जागतिक दर्जाचे स्टार होते, ज्यात ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्स यांचा समावेश होता. मात्र आजपर्यंत या संघाला एकदाही विजेतेपद मिळवता आलेले नाही. रायुडू याने वरिष्ठ खेळाडूंमुळे हा संघ विजेतेपद मिळवू शकला नसल्याचे म्हटले आहे. रायुडूने कोणत्याही खेळाडूचे नाव घेतले नाही, परंतु कदाचित तो सध्याच्या संघात समाविष्ट असलेल्या विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ डुप्लेसि या तीन वरिष्ठ खेळाडूंचा संदर्भ देत होता. आरसीबीने आतापर्यंत चार सामने खेळले आहेत, त्यापैकी तीन सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. कोहलीने या मोसमात आतापर्यंत 203 धावा केल्या आहेत. परंतु प्लेसिसला केवळ 65 धावा करता आल्या असून मॅक्सवेलने केवळ 31 धावा केल्या आहेत.
आरसीबीच्या गोलंदाजांनी नेहमीच जास्त धावा देत आले आहेत आणि त्यांचे फलंदाज एकसंध कामगिरी करू शकत नाहीत. दबावाच्या परिस्थितीत कोण फलंदाजी करत असतात. भारताचे युवा फलंदाज आणि दिनेश कार्तिक. आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी नावे असलेल्या खेळाडूंनी दबावाचा सामना करायला हवा होता, पण मग तेव्हा ते कुठे असतात. त्यावेळी हे सर्व ड्रेसिंग रूममध्ये बसलेले असतात, असेही रायडू म्हणाला.
IPL 2025 : पंड्याच्या नेतृत्वावर नाराज; पुढील मोसमात रोहित शर्मा अन्य संघाकडून खेळणार..?
सोळा वर्षे झाली तरी तीच व्यवस्था
सोळा वर्षे झाली तरी आरसीबीची तीच जुनी अवस्था व व्यवस्था आहे. जेव्हा दबावाची परिस्थिती असते, तेव्हा कोणताही मोठा खेळाडू उपस्थित नसतो. सर्व युवा खेळाडू खालच्या फळीत फलंदाजी करतात तर सर्व वरिष्ठ खेळाडू वरच्या फळीत फलंदाजी करतात. यामुळेच संघाला अद्याप आयपीएल करंडक जिंकता आलेला नाही. गेल्या सामन्यात आरसीबीचा लखनौ सुप जायंट्सकडून पराभव झाला होता. या सामन्यात आरसीबीचे फलंदाज विशेष काही करू शकले नाहीत. चिन्नास्वामी स्टेडियमवर विराट कोहलीचा हा 100 वा टी-20 सामना होता, जो तो संस्मरणीय बनवू शकला नाही, असेही रायडू म्हणाला.