Maharashtra Politics : मोठी बातमी..! महाराष्ट्रातील ६४ नगरसेवक अपात्र; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
Maharashtra Politics : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक खर्चाचा हिशोब वेळेत सादर न करणाऱ्या उमेदवारांविरोधात मोठी कारवाई केली आहे.

Maharashtra Politics : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक खर्चाचा हिशोब वेळेत सादर न करणाऱ्या उमेदवारांविरोधात मोठी कारवाई केली आहे. पुणे विभागातील आणखी २४ उमेदवारांना पुढील तीन वर्षांसाठी अपात्र घोषित करण्यात आले असून, यासह अशा कारवाईतील उमेदवारांची संख्या ६४ वर पोहोचली आहे. (Maharashtra Politics)
पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ही कारवाई केली. संबंधित उमेदवारांना १३ जुलै २०२६ रोजी सुनावणीदरम्यान आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती. मात्र, समाधानकारक खुलासा न केल्याने त्यांना अपात्र घोषित करण्यात आले. (Maharashtra Politics)
कोणत्या ठिकाणच्या उमेदवारांवर कारवाई?
- चाकण नगरपरिषद – १० उमेदवार
- फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषद – १३ उमेदवार
- सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका – १ उमेदवार
कारवाईचे नेमकं कारण काय?
संबंधित उमेदवारांनी निवडणुकीनंतर ३० दिवसांच्या विहित मुदतीत निवडणूक खर्चाचा हिशोब सादर केला नाही. त्यामुळे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियमातील तरतुदींनुसार त्यांना तीन वर्षांसाठी अपात्र ठरवण्यात आले. (Maharashtra Politics)
एकूण ६४ उमेदवार अपात्र
- पुणे महानगरपालिका – २२ उमेदवार
- पंढरपूर नगरपरिषद – १५ उमेदवार
- अक्कलकोट नगरपरिषद – ३ उमेदवार
यापूर्वी अशा ४० उमेदवारांवर कारवाई करण्यात आली होती. आता आणखी २४ उमेदवार अपात्र ठरल्याने एकूण अपात्र उमेदवारांची संख्या ६४ झाली आहे. अपात्र घोषित करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयात उपलब्ध असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. (Maharashtra Politics)






