Pune Ektanagar : गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावासाने राज्यभरात थैमान घातलं आहे. पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. पुण्यातही पावसाने थैमान घातलं आहे. पुणे शहर आणि ग्रामीण भागात पावसाने कहर केला आहे. आज सकाळपासून पावसाने उसंती घेतली असली तरी धुव्वादार झालेल्या पावासामुळे मोठ्या प्रमाणावर खडकवासाला धरणातून विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यातील अनेक सोसायटीमध्ये पावसाचे पाणी शिरले असून, यामध्ये पुन्हा एकदा एकतानगर भाग पावसाच्या पाण्याने वेढला आहे. प्रशासनाचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून, एडीआरएफ दलाच्या जवाणांकडून रेस्क्यू अॅापरेशन सुरू करण्यात आलं आहे. हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केलेल्या यादीत पुण्याचंही नाव आहे. खडकावासला धरणातून मुठा नदीत विसर्ग करण्यात आला आहे. आज सकाळी ९ वाजता ३९,००० क्युसेक विसर्ग खडकवासाला धरणातून सुरू आहे. पुणे ग्रामीण आणि शहरी भागांना पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणातील पाण्यासाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे या चारही धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. मुळामुठेचं पात्र दुथडी भरू वाहू लागलं पानशेत, वरसगाव आणि टेमघर या तीन धरणांतून सोडलेले पाणी खडकवासला धरणात जमा होते. त्यामुळे खडकवासला धरणातून काल दिवसभरात विसर्गामध्ये टप्प्याटप्याने वाढ करण्यात आली. हे पाणी मुठा नदीत पात्रा सोडण्यात आल्याने नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. हेही वाचा : Shruti Haasan: “दक्षिणेचे कलाकार विनम्र आणि देवभक्त असतात”… असं का म्हणाली श्रुती हसन?