Eknath Shinde : आता वराती मागून घोडे! घरात बसणाऱ्यांना मी चांगलंच कामाला लावलं; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Eknath Shinde : काही लोक पहिले घरात देखील भेटत नव्हते, ते आता लोकांच्या दारात जात आहेत, त्यांना मी चांगलेच कामाला लावले आहे. आता वराती मागून घोडे फिरतायेत, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगाविला.

Eknath Shinde : आम्ही टीम म्हणून काम करत आहोत, आमचा अजेंडा हा खुर्ची नसून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देणे आहे. काही लोक पहिले घरात देखील भेटत नव्हते, ते आता लोकांच्या दारात जात आहेत, त्यांना मी चांगलेच कामाला लावले आहे. आता वराती मागून घोडे फिरतायेत, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगाविला. (Eknath Shinde)
एकनाथ शिंदे म्हणाले, ते आपल्याला बेईमान बोलतात, हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी कोणी केली. देवेंद्रजींसोबत बेईमान कोणी केली? देवेंद्रजींबद्दल हे आता बोलतायेत, पण त्यांना खोटं अडकवण्याच काम यांनीच केले, बंगल्यावर पोलीस यांनीच पाठवले. ही आता शिवसेना राहिली नसून शिव्यांची सेना झाली असल्याची टीका एकनाथ शिंदेंनी केली. (Eknath Shinde)
शेतकरी, वारकरी, कार्यकर्ते संकटात होते, तेव्हा हे घरात होते. आता हे वरात काढून फिरत आहेत असे टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. ज्या पद्धतीने महाराष्ट्रात शिवसेना पुढे जात आहे, काही लोक म्हणतं होते की, ही शिवसेना फक्त ठाण्यापूर्ती आहे, निकाल बघा आपला पक्ष दुसऱ्या नंबरचा पक्ष आता झाला आहे. (Eknath Shinde)
हे भाषा आधी करायचे एक तर तू राहशील नाही तर मी राहील, त्यांना आता पुतणा मावशीच प्रेम आलंआहे. देवेंद्रजी आणि मी खंबीरपणे उभा आहे, बाकी मेळाव्यात मी समाचार घेईलच, असे त्यांनी स्पष्ट केले. (Eknath Shinde)
Eknath Shinde: ठाकरेंनी टाकला डाव? शिंदेंच्या आमदाराची लाचखोरी उघड; थेट व्हिडिओच दाखवला…






