मुंबई – करोनाच्या काळापुरते मध्य प्रदेशने वीज बिल स्थगित आणि माफ केले होते. तेच पॅटर्न करोना करीता आणा असे सांगितले होते. पण तेव्हाचे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार इतके निर्दयी होते की, त्यांनी करोना काळात एका नव्या पैशाची सूट शेतकऱ्यांना दिलेली नाही. त्यामुळे त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. मविआच्या सरकारने त्या काळात इतके कनेक्शन कट केले आणि आता कोणत्या तोंडाने बोलत आहेत. आम्ही जे बोलतो ते करतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
महात्मा जोतीबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचं आज मंत्रालयात अनावरण करण्यात आले. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधताना ठाकरेंवर टीका केली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रासह देशात खऱ्या अर्थाने समाजामध्ये सुधारणा करणे, महिलांच्या शिक्षणाकरीता एकप्रकारे क्रांती आणणे. यासाठी महात्मा जोतीबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी योगदान दिले, ते अतुलनीय आहे. कदाचीत त्यांनी संघर्ष केला नसता तर हे अधिकार महिलांना आणि वंचितांना मिळाले नसते. त्यामुळे मंत्रालय हे सत्तेचे सर्वोच्च स्थान आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र काढले आहेत. त्यामुळे महात्मा जोतीबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचेही तैलचित्र असायला पाहिजे, अशी संकल्पना होती. आमचे नवीन सरकार आल्यानंतर या संकल्पनेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गती देण्यात आली, असेही त्यांनी म्हटले.
Love jihad : लव्ह जिहाद विरोधात नाशिकमध्ये हिंदुत्ववादी संघटनांचा मूक मोर्चा
सीमा वाद हा न्यायालयात
कर्नाटक-महाराष्ट्र सीमा वाद हा न्यायालयात आहे. त्यामुळे त्याच्यावर न्यायलय निर्णय देईल. त्यामुळे त्याच्यावर वाद उपस्थित करणं हे दोन्ही राज्यांकरीता योग्य नाही. दोन्ही राज्यांनी न्यायालयावर विश्वास ठेवला पाहिजे. तसेच, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ही याबाबत बैठक घेतली आणि स्पष्टीकरण दिले असल्याचे त्यांनी सांगितले.