नाशिक – श्रद्धा वालकरच्या घृणास्पद मृत्यूनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या घटनेविरोधात सोमवारी रस्त्यावर उतरत लव्ह जिहाद विरोधात देशभरात कठोर कायदा लागू करण्याची मागणी करत सकल हिंदू समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला. लव्ह जिहाद, धर्मांतर विरोधी कायदा, गोवंश हत्या बंदी कायद्यासाठी हिदुं बांधवांनी रस्त्यावर उतरत निषेध व्यक्त केला.
दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. राजकीय पक्ष, संघटनाकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाकडून विराट मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
आफताबने दिल्ली येथे श्रद्धा वालकर हीचे 35 तुकडे करत निर्घुणपणे हत्या केली. या घटनेने युवतींमध्ये दहशत निर्माण झाली आहे. दिल्लीच नव्हे तर राज्यात लव्ह जिहादची समस्या गंभीर रूप धारण करीत आहे.
Maharashtra Karnataka Border Dispute | जामिनावर बाहेर आलेल्या संजय राऊतांवर अटकेची टांगती तलवार
त्यामुळे देशात लव्ह जिहाद विरोधी कायदा तसेच धर्मांतर विरोधी कायदा लागू करावा या मागणीसाठी सकल हिंदू समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. याचा प्रत्यय नाशिकमधून काढण्यात आलेल्या या मोर्चातून दिसून आले.