Congress News : काँग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर ! ‘या’ नेत्याने दिला तडकाफडकी राजीनामा
काँग्रेस पक्षाच्या (Congress News) ‘सृजन संघटन अभियाना’अंतर्गत छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्हा काँग्रेसमध्ये अंतर्गत फेरबदल करण्यात आले आहेत.

Congress News : काँग्रेस पक्षाच्या (Congress News) ‘सृजन संघटन अभियाना’अंतर्गत छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्हा काँग्रेसमध्ये अंतर्गत फेरबदल करण्यात आले आहेत.
मात्र, या संघटनात्मक बदलांमुळे पक्षातील अंतर्गत गटबाजी, नाराजी आणि राजीनाम्याचे सत्र उफाळून आले असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससमोरील आव्हाने वाढली आहेत.
जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील-डोणगावकर
नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या काळात जिल्हाध्यक्ष पदाची धुरा किरण पाटील डोणगावकर यांच्याकडे सोपवण्यात आली होती. पक्षाचा हा निर्णय (Congress News) फायद्याचा ठरल्याचे दिसून आले. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने कन्नड आणि खुलताबाद या दोन्ही नगरपालिकेत नगराध्यक्षपदासह सत्ता मिळवत ग्रामीण भागात चांगली कामगिरी केली.
शहराध्यक्षपदी फेरबदल: शेख युसूफ यांची गच्छंती
ग्रामीण भागाच्या तुलनेत अत्यंत सुमार कामगिरी असलेल्या शहराध्यक्ष पदावर पक्षाने अखेर खांदेपालट केला आहे. शेख युसूफ यांना पदावरून हटवून, पक्षाने पुन्हा एकदा ॲड. सय्यद अक्रम या जुन्या आणि अनुभवी चेहऱ्याला पसंती दिली आहे.
महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पक्षाला मिळालेले अपयश शेख युसूफ यांच्या गच्छंतीला कारणीभूत असल्याचे मानले जात आहे.निरीक्षकांच्या सर्व्हेत आणि आढावा यादीत शेख युसूफ यांचे नाव आघाडीवर (Congress News) असताना अचानक निकष का बदलले? असा सवाल करत युसूफ यांच्या समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
महिला शहराध्यक्षा दीपाली मिसाळ यांचा तडकाफडकी राजीनामा
शहराध्यक्ष बदलाचे नाट्य सुरू असतानाच, काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा दीपाली मिसाळ यांनी सोमवारी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला.त्यांनी आपला राजीनामा थेट राष्ट्रीय नेत्या अलका लांबा आणि प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांच्याकडे पाठवला आहे.
“अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळताना पक्षात अपेक्षित मानसन्मान मिळत नाही,” अशी जाहीर खंत त्यांनी व्यक्त केली. सुमारे २८ महिने काम केल्यानंतर ६-७ महिन्यांपूर्वीच त्यांची दुसऱ्यांदा या पदावर नियुक्ती झाली होती.
‘वंचित’सोबत युती का तुटली?
महापालिकेत काँग्रेसला केवळ एकच जागा जिंकता आली. या अपयशाचे खापर माजी शहराध्यक्ष युसूफ शेख यांच्यावर फोडण्यात आले असले, तरी शेख यांनी वेगळाच दावा केला आहे. ‘वंचित बहुजन आघाडी’सोबत युती न झाल्याचा फटका पक्षाला बसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
राजकीय वर्तुळात आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अशी चर्चा आहे की, जालन्याचे काँग्रेस खासदार डॉ. कल्याण काळे यांच्यामुळेच महापालिकेत वंचितसोबतची युती होऊ शकली नाही. जर ही युती झाली असती, तर महापालिकेचे चित्र आज वेगळे असते, असा सूर कार्यकर्त्यांमधून उमटत आहे.
पक्षाची सद्यस्थिती
वंचितसोबत युती झाली असती तर आज महापालिकेत चित्र वेगळे असते, असा दावाही काँग्रेसकडून केला जात आहे. एकंदरित काँग्रेसच्या सृजन संघटन मोहिमेनंतर पक्षात करण्यात आलेले बदल कार्यकर्त्यांना फारसे रूचलेले दिसत नाहीत.
पक्षाच्या नव्या धोरणानुसार, ज्या नेत्यांनी सलग 5 वर्षे अध्यक्षपद सांभाळले आहे त्यांना पुन्हा संधी न देता नवीन चेहऱ्यांना वाव दिला जात आहे. यामुळे स्थानिक पातळीवर काही जुन्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुप्त नाराजी असली, तरी कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न पक्षश्रेष्ठी करत आहेत.
नवनियुक्त शहराध्यक्षांसमोर असणारी आव्हाने
गेल्या अनेक वर्षांपासून शहरात काँग्रेसला एकही आमदार किंवा खासदार निवडून आणता आलेला नाही. राजकीय गणिते सांभाळण्यासाठी काँग्रेसने पुन्हा एकदा अल्पसंख्याक समाजातील चेहऱ्याला (ॲड. सय्यद अक्रम) संधी दिली आहे. आता विखुरलेली ताकद एकत्र करणे, अंतर्गत गटबाजी संपवणे, आणि नाराज पदाधिकाऱ्यांची मनधरणी करून सर्वांना एकत्र घेऊन (Congress News) चालणे, हे नव्या शहराध्यक्षांसमोरील सर्वात मोठे आव्हान असेल.






