25 वर्षांनंतर कमबॅक करणाऱ्या स्मृती इराणी यांच्याबद्दल सहकलाकार हितेन तेजवानीने केले ‘हे’ मोठे वक्तव्य

kyo ki saas bhi kabhi bahu thi 2 : टीव्हीच्या इतिहासातील एक अविस्मरणीय आणि लोकप्रिय मालिका ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतली आहे. एकता कपूरच्या बालाजी टेलिफिल्मच्या बॅनरखाली तयार झालेली ही मालिका 3 जुलै 2000 ते 6 नोव्हेंबर 2008 या कालावधीत स्टार प्लस वर प्रसारित झाली होती आणि 1800 हुन अधिक भागांनी प्रेक्षकांच्या मनात आपली छाप सोडली होती.
या मालिकेच्या दुसऱ्या पर्वात पुन्हा एकदा स्मृती इराणी ‘तुलसी विराणी’च्या भूमिकेत झळकत आहे.हितेन तेजवानीने या मालिकेचा पुन्हा भाग होणं ही एक सन्मानाची बाब असल्याचं सांगितलं. तो म्हणाला ,”जणू काही आपण थांबलोच नव्हतो. आम्ही तिथूनच सुरुवात केली जिथे आम्ही थांबलो होतो. इतक्या वर्ष्यांनी पुन्हा अश्या एका ऐतिहासिक शोचा भाग होणं, हे खूपच आनंददायी आहे. अश्या शोचे पुरणागमन वारंवार होत नाही. त्यामुळे मी त्याचा पुन्हा भाग होऊ शकलो याबद्दल कृतज्ञ आहे”
स्मृती इराणी बद्दल काय म्हणाला हितेन ?
स्मृती इराणीबद्दल बोलताना हितेन म्हणाला,”ती आजही तशीच आहे. इतकी वर्षे झाली,तिने किती गोष्टी गाठल्या, तरी तिच्यातली एनर्जी अजूनही तशीच आहे. सेटवर ती पूर्वीप्रमाणेच उत्साही आणि प्रोफेशनल आहे.”
राजकारणात सक्रिय स्मृती इराणी
टीव्ही विश्वापासून पुढे जात,स्मृती इराणीने राजकीय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यांनी 2011 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. आणि गुजरातमधून राज्यसभेवर निवडून आल्या. 2019 मध्ये अमेठी लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधींचा पराभव करत खासदार झाल्या. त्यांनी मानव संसाधन,महिला व बालविकास अश्या मंत्रालयाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या .
मालिकेचे महत्व
‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ ही मालिका भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासातील सर्वात यशस्वी मालिकांपैकी एक मानली जाते. ती केवळ एक मालिका नव्हती, तर अनेक घरांतील दैनंदिन जीवनाचा भाग होती. आता त्याच मालिकेचा दुसरा अध्याय प्रेक्षकांना पुन्हा त्या जगात घेऊन जाणार आहे.



