नारायण राणे यांच्या खासदारकीला हायकोर्टात आव्हान; ठाकरे गटाच्या नेत्याकडून गंभीर आरोप करत याचिका दाखल

Narayan Rane | रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे नारायण राणे यांचा विजय झाला. तर ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांचा पराभव झाला. मात्र या लोकसभा मतदार संघातील वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले आहे. नारायण राणे यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका ठाकरे गटाचे नेते विनायक राऊतांनी दाखल केली आहे. मतदारांना धमकावून विजय मिळवल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे.
यापूर्वी खासदार नारायण राणे यांच्या विजयाला आव्हान देण्याचे संकेत ठाकरे गटाने दिले होते. त्यानुसार आता राणे यांच्या खासदारकीला हायकोर्टात आव्हान देण्यात आले आहे. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली आहे. Narayan Rane |
विनायक राऊतांचा गंभीर आरोप
मते विकत घेऊन आणि मतदारांना धमकावून विजय मिळवला असा आरोप करत विनायक राऊत यांनी याचिका दाखल केली आहे. नारायण राणेंनी मते विकत घेऊन आणि मतदारांना धमकावून मिळवलेला विजय रद्द करा. तसेच निवडणूक काळातील भ्रष्टाचाराच्या सखोल चौकशीसाठी स्वतंत्र समिती नेमण्याचे आदेश द्यावे, अशी विनंती याचिकेतून करण्यात आली आहे. Narayan Rane |
याशिवाय नारायण राणे, त्यांचे चिरंजीव नितेश राणे तसेच भाजप कार्यकर्त्यांनी निवडणूक काळात अनेक गैरप्रकार केले. त्याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. मात्र कारवाई करण्याची तसदी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतली नाही. आचारसंहिता भंगाच्या प्रकारांकडे जाणूनबुजून डोळेझाक करण्यात अले आणि निष्पक्ष व पारदर्शक निवडणूक प्रक्रियेच्या तत्त्वाला हरताळ फासला असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. Narayan Rane |
नारायण राणेंविरुद्ध विनायक राऊत
दरम्यान, रत्नागिरी- सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघामध्ये भाजप नेते नारायण राणेंविरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांच्यामध्ये लढत झाली होती. या निवडणुकीत नारायण राणे यांचा 47,858 मतांनी विजय झाला होता.
हेही वाचा:
काँग्रेसचा ट्रॅप! “गद्दारी करणाऱ्या आमदारांना बाहेरचा रस्ता दाखवणार”; नाना पटोलेंनी दिली माहिती





