Maharashtra Politics : मोठी बातमी..! दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? ‘या’ बड्या नेत्याचं मोठं विधान; राजकीय वर्तुळात खळबळ
Maharashtra Politics : विधान परिषद निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्राच्या राजकारणातून अत्यंत खळबळजनक आणि अनपेक्षित बातमी समोर आली आहे.

Maharashtra Politics : विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. (Maharashtra Politics)
अंबादास दानवे यांनी दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र यायला हव्यात, अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या वक्तव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. (Maharashtra Politics)
सध्या राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना असे दोन स्वतंत्र गट कार्यरत आहेत. 2022 मध्ये झालेल्या राजकीय घडामोडीनंतर शिवसेनेत मोठी फूट पडली होती. (Maharashtra Politics)
शिवसेनेचे नाव, पक्ष संघटना आणि चिन्ह याबाबतचा वाद न्यायालयीन प्रक्रियेत गेला होता. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना पक्षाचे नाव एकनाथ शिंदे गटाला दिले, तर उद्धव ठाकरे गटाला मशाल हे निवडणूक चिन्ह देण्यात आले. (Maharashtra Politics)
अशा परिस्थितीत अंबादास दानवे यांनी दोन्ही गटांनी पुन्हा एकत्र येण्याची इच्छा व्यक्त केल्याने राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. मात्र, दानवे यांचे हे वैयक्तिक मत आहे की पक्षाची अधिकृत भूमिका, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया आलेली नाही. (Maharashtra Politics)





