Gopichand Padalkar : “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; पडळकरांचा जयंत पाटलांवर बोचरा वार, केली ‘ही’ मोठी मागणी
Gopichand Padalkar : या टीकेला प्रत्युत्तर देत भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी बोचऱ्या शब्दांत पलटवार केला आहे.

Gopichand Padalkar : मुंबई-पुणे मिसिंग लिंकवरुन राजकीय वातावरण चांगलच तापलं असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाचे राजकारण सुरू झालं आहे. नुकतेच राज्य शासनाचा महत्वकांशी प्रोजक्ट म्हणून पाहिले जात होते, त्या ‘मिसिंग लिंक’वर दरड कोसळण्याची घटना घडली.
या घटनेवरुन शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देत भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी बोचऱ्या शब्दांत पलटवार केला आहे.
राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर, पायाभूत सुविधांची गुणवत्ता आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर जयंत पाटील यांनी गुरुवारी विधानसभेत सरकारला धारेवर धरलं. अल्पकालीन चर्चेत सहभागी होताना पाटील यांनी सरकारच्या विकास मॉडेलवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हजारो कोटींचा खर्च करून उभारण्यात येत असलेल्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पात पहिल्याच पावसात दरड कोसळल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
जयंत पाटील काय म्हणाले? (Gopichand Padalkar)
हा प्रकल्प राबविताना हवामान बदलाचा आणि भौगोलिक जोखमींचा पुरेसा अभ्यास झाला होता का? तसेच या प्रकल्पाचे ‘क्लायमेट ऑडिट’ का करण्यात आले नाही? असे थेट सवाल त्यांनी उपस्थित केले.
हेही वाचा : Party joins the BJP : “भाजपमध्ये ‘हा’ पक्ष विलीन होणार” ; राजकारणात एकच खळबळ
पडळकरांचा पलटवार (Gopichand Padalkar)
“ज्याला सांगली ईश्वरपूरचा रस्ता ४० वर्षात करायचं जमलं नाही तो चालला आहे कनेक्टिंग लिंकचा मुका घ्यायला. बारामती ते फलटण बरेच वर्ष रस्ता नव्हता. देवाभाऊ मुख्यमंत्री झाले आणि तो हायवे तयार झाला. यांना गावातलं कळेना आणि हे निघाले कनेक्टिंग लिंकवर बोलायला.” अशा शब्दांत जयंत पाटील यांच्यावर गोपीचंद पडळकरांनी टीका केली.
केली ‘ही’ मोठी मागणी (Gopichand Padalkar)
कनेक्टिंग लिंकला वीर शिंग्रोबा धनगर नाव द्या, अशी मोठी मागणी गोपीचंद पडळकरांनी केली आहे. ते म्हणाले, “१८५३ ला इंग्रजांनी मुंबई पुणे रस्ता तयार करण्यासाठी एक समिती नेमली. त्यावेळी गोरे लोक रस्ता शोधत होते, त्यावेळी तिथं एक मेंढपाळ होता, त्याने विचारणा केली नेमके हे काय करत आहेत? त्याने पुण्याला जायचा रस्ता सांगितला.
त्यावेळी इंग्रज अधिकारी खुश झाला. अधिकाऱ्यानं विचारलं तुम्हाला काय पाहिजे आहे? त्याने तुम्ही भारतातून निघून जा असं सांगितलं. त्या इंग्रजाने त्या मेंढपाळाला गोळ्या घातल्या. त्या धनगराचं नाव वीर शिंग्रोबा धनगर होतं. म्हणून माझी मागणी आहे त्या कनेक्टिंग लिंकला वीर शिंग्रोबा धनगर नाव द्या.” अशी मागणी पडळकरांनी केली.






