नेवासा – नाशिक परिक्षेञाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या आदेशान्वये नाशिक परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यात सन २०२१ पासून हरवलेलल्या व्यक्तींची विशेष शोध मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांचे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विशेष कामगिरी केली. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूरचे वैभव कल्लूबर्मे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोलीस निरीक्षक धनंजय जाधव व नेवासा पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार यांनी नेवासा पोलीस ठाणे हद्दीतील सन २०२१ पासून हरवलेल्या व निघून गेलेली व्यक्तींचा मागील पाच दिवसांपासून विशेष शोध मोहीम राबविण्यात आली.
सदर शोध मोहिमेमध्ये २४ महिला व १६ पुरुष मिळून आलेले आहेत. घरातील व्यक्ती निघून गेल्यानंतर पोलीस ठाण्यांमध्ये मिसिंग तक्रार नोंदवली जाते अनेकदा निघून गेलेली व्यक्ती काही दिवसांनी घरी परत येते, परंतु त्याबाबत पोलिसांना काही माहिती दिली जात नाही. माञ काही दिवसांनी कामाच्या व्यापामध्ये पोलीस देखील इतर कामाकडे वळाल्याने काही व्यक्तींचा पूर्ण शोध होत नाही व निघून गेलेल्या बहुतांशी व्यक्ती पुढील काळात घरी परत येत असतात. अशा व्यक्तींची विशेष शोध मोहीम नेवासा पोलिसांनी राबविलेली होती.
घरातील व्यक्ती निघून गेल्या बाबत पोलीस ठाण्यामध्ये मिसिंग नोंदवली असेल आणि अशा व्यक्ती जर परत आल्या असतील तर स्थानिक पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन नेवासा पोलिसांनी केले आहे.