मुंबई – “आम्ही शिवसेनेच्या खासदार- आमदारांवर अंधविश्वास ठेवला. तर त्यांनी आमच्याच पाठीत खंजीर खुपसला. जे गेले त्यांच्या रक्तात कधीच शिवसेना नव्हती. आयुष्यभर त्यांच्या कपाळावर गद्दाराचा ठपका असेल”, अशी टीका शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केली होती. भिवंडीत शिवसेना संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
याच कार्यक्रमातील भाषणामध्ये आदित्य यांनी हे वक्तव्य केले. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे. ज्येष्ठ शिवसेना नेते आणि खासदार गजानन कीर्तीकर यांची त्यांच्या गोरेगाव येथील निवासस्थानी भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा संदर्भ देत मुख्यमंत्री शिंदे यांना प्रश्न विचारला होता. त्यावेळी शिंदे यांनी वरील प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “त्यांना काय बोलायचंय ते बोलू द्या. आम्ही आमचं काम करतोय,” असं उत्तर दिलं. पुढे बोलताना शिंदे यांनी, “आम्ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना पुढे नेण्याचं काम करतोय. महाराष्ट्रातील जनतेला आमची भूमिका पटलेली आहे. म्हणूनच आमच्यासोबत ५० आमदार लोकसभेच्या १२ खासदारांनी या भूमिकेचं समर्थन केलंय.
आरेमधील कारशेड कामाला शिंदे सरकारकडून हिरवा कंदील; मेट्रोचे काम पुन्हा होणार सुरु
यावरुन आपल्याला कल्पना आली पाहिजे की जी भूमिका आणि विचार बाळासाहेबांचे होते ते आम्ही आत्मसात केलेत,” असं सांगत आपल्याकडे बहुमत असल्याचं अधोरेखित केलं. तसेच पुढे बोलताना, “जे युतीचं सरकार अडीच वर्षांपूर्वी घडायला पाहिजे होतं ते आता घडलंय. जे बाळासाहेबांना हवं होतं, जी बाळासाहेबांची भूमिका होती ती घेऊन आम्ही पुढे चाललोय,” असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
मोठी बातमी! गणेशोत्सव, दहीहंडी निर्बंधमुक्त होणार; शिंदे सरकारचा निर्णय