औरंगाबाद – आजी-आजोबांनी नवीन चप्पल घेऊन दिली नाही म्हणून एका दहा वर्षाच्या मुलाने आत्महत्या केल्याचा विचित्र प्रकार महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील घडला आहे. सोमवारी दुपारी 12.30 च्या सुमारास ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.हा मुलगा त्याच्या आजी-आजोबांसोबत राहत होता, तर त्याचे आई-वडील दोघेही शेतमजूर म्हणून शेजारच्या गावात राहात आहेत.
सोमवारी मुलाने चप्पलची नवीन जोड मागितली पण आजी आजोबांनी त्याची मागणी मान्य केली नाही. त्यानंतर त्याने आपण आई-वडिलांच्या घरी जात असल्याचे सांगितले,आणि हा मुलगा घरातून बाहेर पडला. पण वाटेतच त्याने एका झाडाला साडीने गळफास लाऊन घेतल्याचे आढळून आले. या धक्कादायक प्रकाराने सगळेच जण आवाक झाले आहेत. पोलिस या प्रकाराची अधिक चौकशी करीत आहेत.