Yogi Adityanath : “माफिया यमलोकाच्या यात्रेवर जातील…”; एन्काउंटरबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना CM योगींनी सुनावले

Yogi Adityanath – उत्तर प्रदेशच्या सुलतानपूर येथे मंगेश यादव याच्या झालेल्या एन्काउंटरमुळे राजकीय पारा वाढला आहे. या प्रकरणावरून राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना लक्ष्य केले आहे.
ते म्हणाले की ‘लूटारूंनी दुकानावर आणि दुकानात उपस्थित ग्राहकांवरच गोळ्या झाडल्या असत्या तर काय झाले असते? असे दिसते आहे की समाजवादी पक्षाच्या दुखत्या जागेवर हात ठेवला गेला आहे.
योगी म्हणाले की, दरोड्याची घटना आणि एन्काउंटरबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी एका बाबीचे उत्तर द्यावे की दरोडेखोरांनी दुकानातील सर्व ग्राहकांना एका बाजूला उभे करून त्यांच्यावर गोळीबार केला असता तर काय झाले असते? स
माजवादी पक्षाने मेलेल्यांचे प्राण परत आणले असते का? त्यांच्या एखाद्या माफिया शिष्याला अथवा दरोडेखोरला पोलिसांनी गोळी घातली की ते आरडाओरड सुरू करतात. लूटारू कोणत्याही जातीचे नसतात.
तो दलितही असता तरी कोणत्या जातीचा नसता. सराफाच्या दुकानात झालेल्या गोळीबाराच्या संदर्भात योगी म्हणाले की कोणाच्या मुलीचे लग्न असते तर कोणाला मुलीला सासरी पाठवण्याच्या वेळी दागिने द्यायचे असतात.
त्यासाठीच लोक सराफांच्या दुकानात जातात. तेथेच जर व्यापाऱ्यांना आणि ग्राहकांना लूटले गेले आणि गोळ्या घालून कोणाची हत्या केली गेली तर पोलिसांना पुढील तपासासाठी कोणतेही धागेदोरे मिळत नाहीत.
जर त्या लूटारूंना पकडण्यात पोलिसांना अपयश आले असते तर समाजवादी पक्षालाच अडचण झाली असती. राज्यात अराजकता पसरली असल्याची ओरड त्यांनीच सुरू केली असती.
आता पोलिसांनी दरोडेखोरांना पकडून कारवाई सुरू केली आहे तरी त्यांना अडचण होते आहे. चकमकीत जर दरोडेखोर मारला गेला आहे तर त्यांना नक्की कशाचा त्रास होतो आहे?
योगी म्हणाले की जनतेसोबत झालेल्या प्रत्येक अत्याचाराचा हिशेब चुकता केला जाईल आणि माफिया एका पाठोपाठ एक यमलोकाच्या यात्रेवर पाठवले जातील. समाजवादी पक्षाच्या लोकांना संधी मिळाली तर राज्यात पुन्हा लूटमार आणि दरोडेखोरी सुरू होईल. सणांच्या दिवसांत विघ्नांची बाधा येईल आणि समाजात पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण होईल.





