Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटणार? बड्या राजकीय नेत्याच्या दाव्याने खळबळ
Maharashtra Politics : या सगळ्या घडामोडीत काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी खळबळजनक दावा केला आहे.

Maharashtra Politics : अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे गेले आहे. मात्र, आता याच पदावरुन मोठं घमासान पक्षात सुरू झालं असून, अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी या निवडीवर आक्षेप नोंदवत कायदेशीर नोटीस पाठवली आहे. यामुळे राष्ट्रावादीत नवा संघर्ष निर्माण झाला आहे. या सगळ्या घडामोडीत काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी खळबळजनक दावा केला आहे.
दादांची राष्ट्रवादी लवकरच फुटणार असल्याचा खळबळजनक दावा सपकाळ यांनी केल्याने राजकीय वर्तुळात आता नव्या चर्चांना उधाण प्राप्त झालं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील कलहावर भाष्य करताना हा दावा केला आहे. या दाव्यासोबत सपकाळ यांनी शिंदेंच्या शिवसेनेतही धुसफूस सुरू असल्याचं म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ? (Maharashtra Politics)
“राष्ट्रवादी अजित पवार पक्षात सगळं काही अलबेल नाही. तुम्हाला लवकरच हा पक्ष फुटलेला दिसेल. शिंदेंच्या शिवसेनेतही धुसफूस आहे. गँगअप सुरु आहे. यांच्यात टोळी युद्ध सुरु झालंय.”
हेही वाचा : US attack on Iran : ‘मोजतबा खामेनी 90% संपले’ ; इराणवर अमेरिकेच्या हल्ल्यादरम्यान ट्रम्पचा मोठा दावा
जुलै महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा रंगली आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला दोन मंत्री पदं मिळणार असल्याचे बोलले जात आहे. या सगळ्या घडामोडी सुरू असतानाचा एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. त्यांच्या या दिल्ली दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, कॅबिनेटपदी शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची वर्णी लागणार असल्याची शक्यता आहे. यावर बोलताना सपकाळ यांनी “पैसा आणि संपत्तीच्या बाबतीत त्यांची परिस्थिती कुठे ठेवू आणि कुठे नको अशी झाली आहे. एकनाथ शिंदे यांना स्वतःला मुख्यमंत्री आणि मुलाला मंत्री करायचं आहे.” अशा शब्दांत शिंदे पिता-पुत्र यांच्यावर निशाणा साधला.
२०२९ मध्ये राऊल गांधींचं भाजपससमोर आव्हान : सपकाळांचा मोठा दावा (Maharashtra Politics)
तसेच सपकाळ यांनी अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा मुद्दा पुन्हा उपस्थित करत सरकारवर जोरदार टीका केली आहे. अरबी समुद्रात या सरकारने शिवस्मारकाचं भूमिपूजन केलं. पण स्मारकाचा अद्याप कसलाही पत्ता नाही. तर मुंबईतील इंदूमिल मधील बाबासाहेबांचं स्मारक झालं नाही असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. २०२९ मध्ये राऊल गांधींचं भाजपससमोर आव्हान असेल, असा मोठा दावाही हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
हेही वाचा : Zareen Khan : मर्यादेत राहायचं! पापाराझीच्या ‘त्या’ विचित्र मागणीवर झरीन खानचा पारा चढला, व्हिडिओ व्हायरल






