India vs Australia 2nd T20 Match Weather Updates : भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आज (26 नोव्हेंबर) तिरुवनंतपुरममध्ये एकमेकांसमोर उभे ठाकतील. उभय संघांमधील टी-20 सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. या सामन्यावर पावसाचं सावट दिसत आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज होणार आहे. तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजता दोन्ही संघ आमनेसामने येतील. शेवटचा सामना ज्याप्रकारे शेवटच्या चेंडूपर्यंत रोमांचक झाला होता,तेच काही या वेळीही पाहायला मिळेल. पण यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हवामानानं साथ दिली पाहिजे.
वास्तविक, केरळच्या राजधानीतील हवामान सध्या स्वच्छ नाही. इथे पाऊस पडत आहे. शनिवारी उशिरापर्यंत येथे पाणी साचले होते. त्याचा परिणाम असा झाला की, मैदान मोठ्या प्रमाणात पाण्याने भरले. आता आजही (रविवार) तिरुअनंतपुरममध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत सामन्यादरम्यान नक्कीच अडथळे येऊ शकतात.
मात्र, क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी अशी आहे की, हवामानाच्या ताज्या अपडेटमध्ये दुपारनंतर पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊसही काही काळच राहणार आहे. अशा परिस्थितीत संध्याकाळी सामना सुरू होईल तेव्हा मैदान कोरडे राहील आणि पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता नाही.
सामन्यादरम्यान येथील तापमान 28 ते 30 अंशांच्या दरम्यान राहील. रात्रीच्या वेळीही हलके ढग असू शकतात. हवेतील आर्द्रता 75% पर्यंत राहील. भारतातील इतर शहरांप्रमाणेच येथील हवेची गुणवत्ता सध्या अत्यंत खराब आहे आणि सामन्याच्या दिवशीही स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांना या खराब हवेमुळे डोळ्यांना आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
मालिकेत भारत 1-0 ने आघाडीवर…
टीम इंडिया सध्या या पाच सामन्यांच्या T20 मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. विशाखापट्टणम येथे झालेल्या T20 सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 209 धावांच्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग केला. टीम इंडियाने एक चेंडू शिल्लक असताना हा विजय मिळवला होता. या मालिकेत सूर्यकुमार यादव भारतीय संघाचे नेतृत्व करत आहेत.