Amit Shah : काँग्रेस नक्की कुणाला खूष करत आहे? वंदे मातरमच्या वादावर गृहमंत्री शहांचा प्रश्न
ज काँग्रेस पक्ष आपला १९३७ चा ठराव राबवत आहे, परंतु विद्यमान संसदेने केलेला कायदा नाकारत आहे.

Amit Shah – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वंदे मातरमसंदर्भातील काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या ठरावावर निशाणा साधला. ते म्हणाले, काल काँग्रेस कार्यकारिणी समितीने देशद्रोही निर्णय घेतला आहे. काँग्रेसने आपल्या १९३७ च्या ठरावानुसार ‘वंदे मातरम’चे केवळ दोन श्लोक गाण्याचा निर्णय घेतला आहे.
मला देशाला आठवण करून द्यायची आहे की, १९३७ मध्ये काँग्रेसने मुस्लिमांना खूश करण्यासाठी वंदे मातरमचे विभाजन करून देशाच्या फाळणीचा पाया घातला होता.
आज नरेंद्र मोदी सरकारने काँग्रेसची ही चूक सुधारली आहे आणि राष्ट्रीय ऐक्य मजबूत करण्यासाठी त्याला कायदेशीर आधार दिला आहे. काँग्रेसचा हा निर्णय त्यांचे तुष्टीकरणाचे धोरण स्पष्टपणे दर्शवतो.
काँग्रेसने केवळ बंकिमचंद्र चटर्जी बाबूंच्या या रचनेचाच अपमान केला नाही, तर देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या लाखो लोकांचाही अपमान केला आहे.
अमित शाह म्हणाले, आज काँग्रेस पक्ष आपला १९३७ चा ठराव राबवत आहे, परंतु विद्यमान संसदेने केलेला कायदा नाकारत आहे.
मला आश्चर्य वाटते की लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा काही घटकांना खूष करण्याचे राजकारण करत आहे. देशाने एकदा ‘वंदे मातरम’चे दोन भाग करण्याची चूक केली होती आणि त्याचे परिणाम आपण भोगले आहेत.





