Ajit Pawar : अपघाताच्या आदल्या दिवशी काय घडलं? चालकाने सांगितला शेवटचा संवाद म्हणाले “अजितदादांनी ऐकलं असतं, तर….”
Ajit Pawar : अजित पवार यांचा विमान अपघातात निधन झाल्यानंतर आता त्यांचे चालक श्यामराव मनवे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

Ajit Pawar : महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काल विमान अपघातात दुर्देवी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्रासह देशभरात दुःख व्यक्त केले जात आहे. नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यत अनेकांना अजित पवार यांच्या आठवणी सांगतला अश्रू अनावर झाले. ‘कामाचा माणूस’ आपल्यात नाही या गोष्टींवर अजूनही लोकं विश्वास ठेवायला तयार नाहीत. पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच या अपघातात इतर पाच जण दगावले असून त्यांच्याही कुटुंबासाठी हा मोठा आघात आहे.
आता अजित पवारांचे चालक श्यामराव नारायण मनवे यांना देखील दुःख झाले असून, त्यांनी अजित पवारांसोबत झालेल्या शेवटच्या संभाषणाचा खुलासा केला आहे. “आपण अजित पवारांना रात्रीच गाडीतून पुण्याला जाऊ असं सांगितलं होतं. पण दादांनी ऐकलं नाही. अजितदादांनी ऐकलं असतं, तर कदाचित दुर्देवी घटना घडली नसती”. असा खुलासा श्यामराव मनवे यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले श्यामराव मनवे?
७१ वर्षांचे श्यामराव मनवे हे अजित पवार यांचे चालक म्हणून १९९९ पासून त्यांचे सोबत आहेत. अजित पवार यांच्याविषयी श्यामराव मनवे यांनी आपल्या आठवणी सांगितल्या. यावेळी बोलातना ते भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. “दादा माझे दैवत होते. दादा माझ्या घरी गणपतीत जेवायला आले होते. 2013 साली शासनातून निवृत्त झाल्यावर मी आजपर्यंत दादांसोबतच काम करत आहे. आज सकाळी अजितदादा 7.30 वाजता मुंबई येथील बंगल्यावरुन निघाले आणि काही वेळाच ही दुर्दैवी घटना घडली. माझ्या आयुष्यातील सर्वस्व गमावल्याची भावना आहे. कारण हा अपघात दुर्दैवी आहे,” अशी दुःखद प्रतिक्रिया मनवे यांनी दिली.
या अपघातात अजित पवार यांच्यासोबत विमानात असलेल्या पाच जणांना देखील आपले प्राण गमवावे लागले आहे. या विमानात उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी विदीप जाधव, विमान परिचारिका पिंकी माळी, मुख्य वैमानिक सुमित कपूर आणि सह-वैमानिक शंभवी पाठक असे 5 जण होते.





