Bullock Cart Race: जाणून घ्या बैलगाडा शर्यतींसाठी अटी काय? उल्लंघन झाल्यास 5 लाख दंड, 3 वर्ष सक्तमजुरी

मुंबई – बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टानं महत्वाचा निर्णय देत बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली आहे. राज्यात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील बैलगाडा मालकांना दिलासा मिळाला आहे. राज्यभरात ठिकठिकाणी या निर्णयाचं बैलगाडा प्रेमींकडून जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. मात्र शर्यतीसाठी काही अटी घातल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे..
1 बैलगाडा शर्यतींसाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असणार आहे.
2 शर्यतीदरम्यान बैलांना क्रूर वागणूक देता येणार नाही.
3 बैल धावण्याचे शर्यतीचं अंतर 1 किलोमीटरपेक्षा जास्त असू नये.
4 रस्त्यावर किंवा महामार्गावर शर्यतीचे आयोजन करून नये.
5 अतिशय उतार असलेली, खडक, चिखल, पानथळीची जागा शर्यतीसाठी वापरता येणार नाही.
6 शर्यतीसाठी बैलांना 30 मिनिटे आराम द्यावा, एका दिवसात 3 पेक्षा जास्त शर्यतींनासाठी एकाच बैलाचा वापर करता येणार नाही.
7 धावपट्टीवर आणण्यासाठी बैलांना किमान 20 मिनिटे आराम द्यावा.
8 इतर कोणतेही वाहन धावपट्टीवर चालवण्यास मनाई असेल.
9 बैलास दुखापत होण्यासारखं काठी, चाबकासारखं साधन जवळ बाळगण्यास मनाई.
10 बैलाची शेपूट पिरगळणं, शेपटीस चावा घेणं, लाथ मारून इजा पोहचवण्यास प्रतिबंध.
11 नियमांचे उल्लंघन झाल्यास 5 लाखाचा दंड, तीन वर्ष सक्तमजूरीची शिक्षा
12 बैलगाडा मालकानं नियमांचं उल्लंघन केल्यास इतर कोणत्याही शर्यतीत सहभागी होता येणार नाही.




