Politics News : पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ बरखास्त करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतरही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास ममता बॅनर्जी यांनी नकार दिल्यानंतर राज्यपालांनी हा मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. (Politics News) घटनात्मक प्रक्रियेनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. निवडणुकीतील दारुण पराभवानंतर ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेत निकालांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी हा निकाल “जनादेश नसून षडयंत्र” असल्याचा आरोप केला. (Politics News) ममता बॅनर्जी म्हणाल्या, “माझ्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आमचा पराभव जनतेच्या कौलामुळे झालेला नाही. जवळपास १०० जागांवर मतांची चोरी झाली असून मतमोजणी जाणीवपूर्वक मंदावण्यात आली.” (Politics News) तसेच, भाजपपेक्षा निवडणूक आयोगानेच भाजपसाठी काम केल्याचा आरोपही त्यांनी केला. विरोधी ‘इंडिया’ आघाडी मजबूत करण्यासाठी रस्त्यावर उतरून लढा देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (Politics News) दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवत तृणमूल काँग्रेसची सलग १५ वर्षांची सत्ता संपुष्टात आणली आहे. या घडामोडींमुळे बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून पुढील राजकीय समीकरणांकडे देशाचे लक्ष लागले आहे. (Politics News)