Sanjay Raut : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून चार नावांची घोषणा करण्यात आली. यामध्ये दोन नवीन चेहऱ्यांना भाजपने संधी दिली आहे. तर पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन त्यांचे राजकीय पुनवर्सन केले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. गेल्या काही काळापासून विनोद तावडे सक्रिय राजकारणातून फेकले गेल्याचे बोलले जात होते. मात्र, २०२५ मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीत विनोद तावडे यांनी बजावलेली भूमिका आणि त्यामुळे पक्षाला मिळाले यश याचे गिफ्ट भाजपने त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. या निवडीवसह इतर तीन राज्यसभेच्या उमेदवार निवडीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कौतुक केले आहे. “विनोद तावडेंचं राजकीय पुनर्वसन वाटत नाही. कारण विनोद तावडे यांच्यासारखे कार्यकर्ते हे सतत पक्षाचं काम करत असतात. मी त्यांना फार आधीपासून ओळखतो. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून ते दिल्लीपर्यंत त्यांनी काम केलं आहे. बिहार, केरळात त्यांनी काम केलं. अशावेळी पक्षाने त्यांच्या कार्याची दखल घेतली आणि उमेदवारी दिली तर तो सन्मान असतो,” असे कौतुकाचे उद्गार संजय राऊत यांनी काढले आहेत.Sanjay Raut Sanjay Raut पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले “महाराष्ट्रातून एका विशिष्ट गटाने विनोद तावडे यांच्यासारख्या नेत्याला राजकारणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण नाउमेद न होता त्यांनी पक्ष संघटनेचं काम सुरु ठेवलं. त्यांना दिल्लीत केलेल्या कामाचं यश मिळालं आहे. कामाचा गौरव केला जातो तेव्हा कार्यकर्त्याचं कौतुक केलं पाहिजे. भाजपाने जे उमेदवार दिले आहेत ते कौतुक करण्यासारखेच आहेत याबाबत माझ्या मनात शंका नाही.” Sanjay Raut महाविकास आघाडीकडून राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार उमेदवार आहेत. महाविकास आघाडीत राज्यसभेच्या एका जागेवरून बराच खल सुरू होता. अखेर शरद पवार यांच्याच नावावर शिक्कामोर्तेब करण्यात आला. यावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले, “काल सर्वानुमते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावावर सगळ्यांनी सहमती दर्शवली. खरं म्हणजे आदित्य ठाकरे सातत्याने सांगत होते की, शिवसेना मोठा पक्ष आहे, त्यामुळे ही जागा शिवसेनेले लढलं पाहिजे. ही भूमिका योग्य होती. त्यानंतर १६ आकड्यासह काँग्रेस आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे १० आहेत तरी आम्ही ही जागा शरद पवारांसाठी सर्वांनी सोडली आहे. त्यांनी पुन्हा राज्यासभेत जावं यासाठी हा निर्णय घेतला.” हेही वाचा : Shreya Ghoshal: ‘चिकनी चमेली’नंतर श्रेया घोषालचा मोठा निर्णय; म्हणाली आता ऑब्जेक्टिफिकेशन असलेली गाणी गाणार नाही