Amol Mitkari : लवकरच नवी वेळ! अखेर अमोल मिटकरी यांनी सांगून टाकलं; ट्वीट चर्चेत म्हणाले “महाराष्ट्राला सुखद “पुरोगामी” धक्का…”
Amol Mitkari : अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे माजी आमदार अमोल मिटकरी यांच्या ट्वीटने चर्चांना उधाण आले आहे.

Amol Mitkari : आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. याला कारण ठरलं आहे ते म्हणजे शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील ( Jayant Patil) आणि भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे ( Vinod Tawde) यांच्यात मुंबईतील एका पंचतारांकित हॅाटेलमध्ये झालेली बैठक. या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये एनडीएत सहभागी होण्यासाठी चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
मात्र, या वृत्तावर अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे माजी आमदार अमोल मिटकरी यांच्या ट्वीटने चर्चांना उधाण आले आहे. त्यांनी एक्सवरील ट्वीटमध्ये हॅशटॅग वापरून लवकरच नवी वेळ असं म्हटलं आहे. यामुळे शरद पवार गट एनडीएत सहभागी होण्याच्या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. त्यामुळे आगामी काळात नेमकं काय घडणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Amol Mitkari)
आदरणीय पवार साहेब यांना भविष्याचं आकलन आहे.आज जरी त्यांचा पक्ष कांग्रेस किंवा NDA च्या सोबत जाण्याच्या चर्चेत दिसत असला तरी योग्य वेळी योग्य निर्णय होईल आणि हा महाराष्ट्राला सुखद “पुरोगामी” धक्का असेल. साहेबांच्या पक्षात राजकीय दृष्ट्या समयसुसंगत कुणी नेता नसल्याचे चित्र त्यांना…
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) July 7, 2026
नेमकं काय म्हणाले अमोल मिटकरी? (Amol Mitkari)
“आदरणीय पवार साहेब यांना भविष्याचं आकलन आहे. आज जरी त्यांचा पक्ष कांग्रेस किंवा NDA च्या सोबत जाण्याच्या चर्चेत दिसत असला तरी योग्य वेळी योग्य निर्णय होईल आणि हा महाराष्ट्राला सुखद “पुरोगामी” धक्का असेल. साहेबांच्या पक्षात राजकीय दृष्ट्या समयसुसंगत कुणी नेता नसल्याचे चित्र त्यांना स्पष्ट दिसत आहे.#लवकरच नवी वेळ”
तावडे-पाटील यांच्यात बैठक

विनोद तावडे आणि जयंत पाटील ह्यच्यात मुंबईत बैठक
सत्तेत सहभागी होण्याची शक्यता निर्माण झाल्यास पक्षाची पुढील भूमिका काय असावी, यावर विचारमंथन बैठकीत झाल्याचे समजते. या भेटीबाबत जयंत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी विनोद तावडे यांची भेट झाल्याचे मान्य केले. मात्र, ही केवळ अनौपचारिक भेट होती आणि कोणताही राजकीय निर्णय किंवा ठोस चर्चा झालेली नसल्याचे स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला दिले.
अधून-मधून चर्चा
दरम्यान, अजित पवार यांच्या निधनापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होती. दोन्ही गट एकत्र आल्यास ते राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)सोबत राहतील की इंडिया आघाडीसोबत, हा प्रश्न कायम चर्चेत होता. मात्र, अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर त्या चर्चांवर पडदा पडला आहे. मात्र, अधून मधून ही चर्चा होतच असते.





