Umesh Yadav Rain Delay Statement RR vs RCB IPL 2026 : आरआर आणि आरसीबी यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी गुवाहाटीमध्ये पावसाने हजेरी लावली. सामना वेळेवर सुरू न झाल्याने चाहते निराश झाले असतानाच, प्री-मॅच शोमध्ये उमेश यादवने एक मजेदार पण तितकंच तार्किक विधान केलं. उमेश म्हणाला, “सध्याच्या परिस्थितीत वाट पाहण्याचं फळ हे ‘षटकार’ असतं!” त्याच्या या विधानाने क्रीडाप्रेमींमध्ये एकच हशा पिकला. नेमकं असं का म्हणाला उमेश? उमेश यादवने आपल्या विधानामागचे शास्त्रीय कारणही स्पष्ट केले. तो म्हणाला की, जेव्हा पावसामुळे सामन्यात उशीर होतो, तेव्हा गोलंदाजांना नीट वॉर्म-अप करण्याची संधी मिळत नाही. अशा परिस्थितीत गोलंदाजांना आपली लय (Rhythm) शोधण्यासाठी वेळ लागतो. याउलट, फलंदाज सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्र्यात असतात. गोलंदाज स्थिरावण्याआधीच फलंदाज मोठे फटके मारायला सुरुवात करतात, ज्यामुळे सामन्याच्या सुरुवातीलाच षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. वैभव सूर्यवंशीच्या ‘त्या’ खेळीची आठवण – आपला मुद्दा पटवून देण्यासाठी उमेशने राजस्थानच्या वैभव सूर्यवंशीचे उदाहरण दिले. याच हंगामात राजस्थान आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामनाही पावसामुळे ११-११ षटकांचा करण्यात आला होता. त्यावेळी १५ वर्षीय वैभवने पहिल्याच चेंडूवर जगातील सर्वोत्तम गोलंदाज जसप्रीत बुमराहला षटकार ठोकला होता. उमेशच्या मते, पावसाच्या व्यत्ययानंतर गोलंदाज गाफील असताना फलंदाज असाच फायदा उचलतात. हेही वाचा – Ayush Shetty : आयुष शेट्टीने विश्वविजेत्या क्रिस्टीला लोळवत रचला इतिहास! आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये पदक केलं निश्चित विजेतेपदाच्या शर्यतीत कोण मारणार बाजी? गुवाहाटीमधील पाऊस थांबला असून सामन्याला सुरुवात झाली आहे.विशेष म्हणजे, या हंगामात दोन्ही संघांनी आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. राजस्थानने सलग तीन विजय मिळवले आहेत, तर बंगळुरूने आपले पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे या ‘अनबेअटेबल’ संघांमधील लढतीत नक्की कोणाचा विजयरथ सुसाट धावतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.