Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का..! खासदारांनंतर आता आमदारही फुटणार? ‘मातोश्री’वर धाकधूक वाढली
Uddhav Thackeray : संसदेत ६ खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटासमोर आणखी एक मोठे संकट उभे ठाकले आहे.

Uddhav Thackeray : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आज पक्षाच्या आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. (Uddhav Thackeray )
मात्र, या बैठकीला चार आमदार अनुपस्थित राहिल्याने नव्या राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे. आमदार संजय दरेकर, राहुल पाटील, संजय पोतनीस, सुनील शिंदे हे चार आमदार बैठकीला अनुपस्थित राहिले आहेत. त्यामुळे चर्चाना पुन्हा उधाण आले आहे. (Uddhav Thackeray )
बैठकीला तीन आमदार गैरहजर
खासदारांच्या बंडानंतर पक्षाची पुढील रणनीती ठरवण्यासाठी आणि आमदारांशी संवाद साधण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी ही बैठक आयोजित केली होती. मात्र, या बैठकीत तीन आमदार गैरहजर राहिल्याने त्यांच्या भूमिकेबाबत विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. यामुळे खासदारांनंतर आता आमदारांमध्येही फूट पडणार का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. (Uddhav Thackeray )
सहा खासदारांचा शिंदे गटात प्रवेश
दरम्यान, ठाकरे गटातील बंडखोर सहा खासदार मुंबईत दाखल झाले असून ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या घडामोडीमुळे ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे. (Uddhav Thackeray )
अनुपस्थितीमागे नेमकं कारण काय?
बैठकीला गैरहजर राहिलेल्या तीन आमदारांनी अद्याप अनुपस्थितीचे अधिकृत कारण स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे ते पक्षाविरोधात भूमिका घेणार आहेत की अन्य काही कारणामुळे बैठकीस हजर राहू शकले नाहीत, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. (Uddhav Thackeray )






