1. “शिवराय युद्ध करुन थकले आणि समर्थ रामदासांकडे राजपाट दिला” नागपुरातील भाषणात बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री अर्थात बागेश्वर महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्यावर भाष्य केले. बागेश्वर महाराजांनी आपल्या भाषणात दावा केला की, “छत्रपती शिवाजी महाराज समर्थांकडे गेले आणि म्हणाले की आपण खूप युद्धे लढलो, आता हे राज्य तुम्हीच सांभाळा. काही दिवस मला काहीच करायची इच्छा नाही. त्यावर समर्थांनी राज्य चालवण्याचे मान्य केले, पण ते राजांच्याच आदेशानुसार असेल असे सांगितले.” इतकेच काय तर त्यांनी “हिंदूंनी चार मुलांना जन्म द्यावा आणि त्यातील एक मूल राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी समर्पित करावे,” असेही विधान केले. दरम्यान, जगातील पहिले भारतदुर्गा मंदिर नागपूरच्या जामठा परिसरात उभारले जाणार असून, त्याचा भव्य शिलान्यास सोहळा नागपूरमध्ये पार पडला. यावेळी बागेश्वर महाराज यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. PCMC Property Tax Restructuring : महापालिकेचा मास्टरस्ट्रोक! झोपडपट्ट्या आणि गावांच्या टॅक्स रचनेत मोठे बदल; पाहा नवे दर 2. संजय गायकवाडांच्या घरावर मोर्चा काढणार – रोहित पवार शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या निषेधार्थ २८ एप्रिल रोजी बुलढाण्यातील त्यांच्या घरावर मोर्चा काढण्याची घोषणा शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली. याच दिवशी बुलढाण्यात ‘शिवाजी कोण होता ?’ या ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या पुस्तकाचे जाहीर वाचन केले जाणार आहे. दरम्यान, या पुस्तकाचे विद्यमान प्रकाशक प्रशांत आंबी यांना आमदार गायकवाड यांनी बुधवारी रात्री शिवीगाळ केली. जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून आंबी यांनी गुरुवारी कोल्हापुरातील राजारामपुरी पोलिस ठाण्यात तक्रार केली. पण, २४ तासानंतरही गुन्हा दाखल करण्याची कोणतीच प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली नाही. यामुळे यांनी थेट शेकडो कार्यकर्त्यांसह पोलिस ठाण्यात धडक दिली. तसेच पोलिस अधिकारी सतीश होडगर यांना धारेवर धरले. Sanjay Gaikwad 3. अतिव्यायाम घातक! तरुणाची मेंदूतील रक्तवाहिनी फाटली जिममधील अतिव्यायाम एका 23 वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतल्याची घटना घडली आहे. नागपूरमध्ये ओम भोयर तरुणाची अतिव्यायामामुळे मेंदूतील रक्तवाहिनी चक्क फाटली आहे. मात्र ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळाल्याने त्याचा प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. परंतु या घटनेनंतर अतिव्यायाम करणाऱ्या तरुणांनी काळजी घेण्याची गरज असल्याचे समोर आलं आहे. 10 एप्रिलला ओम भोयर नेहमीप्रमाणे जिममध्ये गेला. तेथे त्याने शारिरिक क्षमतेपेक्षा अति ताण सहन करत जिम मारायला सुरवात केली. त्यामुळे त्याला अचानक त्रास होऊ लागला आणि कालांतराने कळालं कि त्याची मेंदूची रक्तवाहिनी फुटलीय. या नंतर त्याचे डोके दुखायल लागले, उलटी झाली, मात्र ओमच्या ही बाब प्रथमदर्शनी लक्षात आली नाही. काही तासाने त्याला अस्वस्थ वाटू लागले व पुढे त्याला अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले. सध्या त्यावर उपचार सुरु असून सुदैवाने डॉक्टरांनी ‘गोल्डन अवर’मध्ये शस्त्रक्रिया करून त्या तरुणाला मृत्यूच्या दाढेतून परत आणले आहे. डॉक्टरांच्या अचूक निर्णयामुळे आणि वेळेत मिळालेल्या उपचारामुळे जो रुग्ण व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज देत होता, तो अवघ्या १० दिवसांत स्वतःच्या पायावर उभा राहिला. PMC News : महापालिकेत भाजपची हुकूमशाही? विरोधकांचा दोनदा सभात्याग; नेमकं काय घडलं? 4. ‘मृत्यूपत्र’ सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी सरकारची गंभीर आजारपणात किंवा मृत्यूशय्येवर असताना वैद्यकीय उपचारांबाबत आपली इच्छा आधीच व्यक्त करणाऱ्या नागरिकांचे मृत्यूपत्र अथवा इच्छापत्र जतन करण्याबाबत राज्य शासनाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इच्छापत्रांच्या संरक्षणासाठी कस्टोडियन म्हणून राज्यातील महापालिकांमध्ये आयुक्त, तर नगरपालिकांमध्ये मुख्याधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश नगरविकास विभागाने दिले आहेत. यासाठी एक स्वतंत्र डिजिटल प्लॅटफॉर्मही कार्यान्वित करण्यात आला आहे. शासनाच्या निर्णयानुसार, शहरी भागातील जन्म- मृत्यू निबंधक म्हणून कार्यरत असलेले महापालिका आयुक्त आणि नगरपालिका, नगरपंचायतींचे मुख्याधिकारी यांची आता अधिकृत कस्टोडीयन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नोंदणी प्रक्रियेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन सुविधा असणार आहे. ऑनलाइन अर्जानंतर ७ दिवसांत कस्टोडियनची भेट घेऊन कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करावी लागेल. ऑफलाइन प्रक्रियेत नोटरी केलेले प्रतिज्ञापत्र दोन प्रतींमध्ये सादर करणे आवश्यक आहे. या सेवेसाठी १,००० रुपये नोंदणी शुल्क आकारले जाईल. तसेच, भविष्यात हे इच्छापत्र रद्द करायचे असल्यास मूळ प्रत सादर करून पोर्टलवरून माहिती हटवण्याची तरतूदही करण्यात आली आहे. या निर्णयामुळे नागरिकांच्या हक्कांचे कायदेशीर संरक्षण अधिक सुलभ होणार आहे. 5 . विधान परिषदेतील निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या ६ नेत्यांची नावं चर्चेत विधान परिषदेतील 10 जागांपैकी एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाटेला येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विधान परिषदेच्या या एका जागेवरून चांगलीच रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून एका जागेसाठी ६ जणांची नावं चर्चेत आहेत. यामध्ये प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय माजी आमदार राजेंद्र जैन, सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे, बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आणि माजी आमदार झिशान सिद्दीकी, राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे, सुनील टिंगरे आणि उमेश पाटील यांची नावं चर्चेत आहेत. तसंच अमोल मिटकरी उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्नात असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, विधानपरिषदेच्या १० जागांसाठी पुढच्या महिन्यात १२ मे २०२६ रोजी मतदान होणार आहे. या दिवशी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान तर सायंकाळी ५ वाजल्यानंतर मतमोजणी केली जाणार आहे. 6. ‘आप’ सोडण्याचे कारण सांगत राघव चड्ढांकडून मोदींचे कौतुक आम आदमी पक्षाच्या राज्यसभेतील १० पैकी ७ खासदारांनी शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आपला खूप मोठा राजकीय धक्का बसला आहे. आपचे खासदार राघव चड्ढा, संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांच्यासह सात जणांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा शुक्रवारी राजीनामा दिला. यानंतर राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी पक्ष सोडण्यामागचे कारण सांगत म्हंटले की, “अरविंद केजरीवाल यांच्यासाठी आप पक्ष आता देशासाठी नाही, तर स्वतःच्या फायद्यासाठी काम करीत आहे. TOP 10 NEWS गेल्या काही वर्षांत मला, असे वाटू लागले होते की मी योग्य व्यक्ती असलो तरी आपसारख्या चुकीच्या पक्षात कार्यरत आहे. त्यामुळेच मी आपपासून दूर जाण्याचा आणि जनतेची अधिक जवळून सेवा करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील १२ वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने धाडसी निर्णय घेतले आहे. ज्यासाठी इतर राजकीय पक्ष घाबरतात. मोदींच्या नेतृत्त्वावर देशाची जनता विश्वाास दाखवते, आतापर्यंत ३ वेळा त्यांनी विश्वास दाखवला आहे,” असं म्हणत राघव चड्ढा यांनी पक्षातून बाहेर पडण्याचं कारण सांगितलं आहे. donald trump 7. “भारतात येऊन पाहा, मग बोला”; ट्रम्प यांना इराणचे प्रत्युत्तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविषयी केलेल्या वादग्रस्त टिप्पणीला इराणच्या मुंबई आणि हैदराबादमधील दूतावासांनी ‘एक्स’वरून उत्तर दिले आहे. ट्रम्प यांनी भारत आणि चीनचा ‘नरकाचे द्वार’ असा उल्लेख करणारा एक लेख समाजमाध्यमावर प्रसिद्ध केल्यानंतर भारतामध्ये त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली. परराष्ट्र मंत्रालयाने उत्तर देताना ‘हे भारताविषयी अज्ञानातून केलेले केलेले अयोग्य विधान’ असल्याचे म्हटले. इराणच्या मुंबईमधील वाणिज्य दूतावासाने महाराष्ट्राची वैशिष्ट्ये असलेला एक १८ सेकंदांचा व्हिडिओ प्रसिद्ध केला. “कोणीतरी ट्रम्प यांच्यासाठी एका दिवसाच्या सांस्कृतिक डिटॉक्सची नोंदणी करावी, त्यामुळे कदाचित त्यांची वायफळ बडबड कमी होईल. कधी भारतात येऊन पाहा, मग बोला,” असेही लिहिले आहे. तर दुसरीकडे इराणच्या हैदराबादमधील वाणिज्य दूतावासाने भारत आणि चीनच्या प्राचीन संस्कृतीची प्रशंसा केली. “चीन आणि भारत हे संस्कृतीचे उगमस्थान आहेत. खरा नरक तर ती जागा आहे, जिथे युद्धखोर राष्ट्राध्यक्षाने इराणची संस्कृती नष्ट करण्याची धमकी दिली होती,” असे दूतावासाने पोस्टमध्ये नमूद केले आहे. यानंतर हैदराबाद दूतावास आणि मुंबई दूतावास यांच्यात कोणते शहर अधिक चांगले याची स्पर्धा सुरू झाली. 8. RBIकडून पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द भारतीय रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेवर मोठी कारवाई करत तिचा बँकिंग परवाना रद्द केला आहे. २४ एप्रिल २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या कठोर आदेशानुसार, आता या बँकेला कोणत्याही प्रकारची बँकिंग सेवा देता येणार नाही. हा निर्णय शुक्रवारी कामकाज संपल्यानंतर तत्काळ लागू करण्यात आला असून, दीर्घकाळ चाललेल्या नियमभंग आणि नियामक अडचणींमुळे बँकेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. बँकेने परवाना देताना घालून दिलेल्या अटी व नियमांचे पालन केले नाही, तसेच तिचे व्यवस्थापन आणि कार्यपद्धती जनहित व ग्राहकांच्या हिताच्या विरोधात असल्याचे RBIच्या निरीक्षणात आले आहे. Paytm पेमेंट्स बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेने रद्द केल्याने ग्राहकांना नवीन खाते उघडणे, पैसे जमा करणे किंवा इतर बँकिंग सेवा घेणे आता शक्य राहणार नाही. मात्र, ग्राहकांना त्यांच्या खात्यातील आधीच्या रकमेची सुरक्षितपणे पैसे काढण्याची मुभा राहील. व्यवहारांवर मर्यादा आल्याने UPI, वॉलेट आणि ऑटो-पे सेवांमध्ये अडथळे येऊ शकतात. ग्राहकांनी लवकरात लवकर पर्यायी बँकिंग व्यवस्था निवडणे आवश्यक आहे. विराटच्या बॅटमधून सुटलं विक्रमांचं वादळ! गुजरातविरुद्धच्या सामन्यात रचला अजब इतिहास 9. विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नावावर असलेल्या विराट कोहलीने गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. या खेळीदरम्यान विराटने आयपीएलमध्ये ८०० चौकार पूर्ण करण्याचा मान मिळवला. असा पराक्रम करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. त्याच्या खालोखाल शिखर धवन (७६८ चौकार) दुसऱ्या क्रमांकावर आहे. केवळ चौकारच नाही, तर विराटने या सामन्यात एक उत्तुंग षटकार खेचत आयपीएल कारकिर्दीतील ३०० षटकार पूर्ण केले. आयपीएलमध्ये ३०० षटकार मारणारा विराट हा एकूण तिसरा आणि रोहित शर्मानंतरचा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. या यादीत ख्रिस गेल ३५७ षटकारांसह अव्वल स्थानी आहे, तर रोहित शर्मा ३१० षटकारांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराटने २७४ सामन्यांत हा टप्पा गाठला असून, एमएस धोनी (२६४) आणि एबी डिव्हिलियर्स (२५१) यांना त्याने मागे टाकले आहे. 10. ‘बल्लू’ इज बॅक! ‘खलनायक रिटर्न्स’चा टीझर प्रदर्शित अभिनेता संजय दत्त आता आपल्या सर्वात गाजलेल्या ‘खलनायक’ अवतारात पुन्हा परतला आहे. संजय दत्तच्या ‘खलनायक रिटर्न्स’चा टीझर प्रदर्शित झाला असून, तब्बल ३३ वर्षांनंतर ‘बल्लू’ पुन्हा एकदा पडद्यावर राज्य करण्यासाठी सज्ज झाला आहे. यावेळी बल्लूचा अंदाज पूर्वीपेक्षाही अधिक भयानक आणि खतरनाक दिसत आहे. संजय दत्तने २४ एप्रिल रोजी ‘खलनायक रिटर्न्स’ची अधिकृत घोषणा करत सोशल मीडियावर टीझर शेअर केला. TOP 10 NEWS हा टीझर पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. लांब केस, दाढी, डोळ्यात आग असा संजय दत्तचा भीतीदायक लूक आहे. दरम्यान, ‘खलनायक रिटर्न्स’ हा १९९३ मध्ये आलेल्या सुपरहिट ‘खलनायक’ चित्रपटाचा सीक्वेल आहे. मूळ चित्रपटात संजय दत्तसोबत माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. हेही वाचा : Raghav chadhdha : “देशाला विसरुन नेते सत्ता आणि पैशाच्या पाठीमागे…”; राघव चढ्ढांच्या भाजप प्रवेशावरुन आण्णा हजारेंची संतप्त प्रतिक्रिया