‘यारी मे गद्दारी नही और गद्दारोंसे यारी नही’; अरबाज आता धनश्रीच्या प्रेमात? निक्कीने पोस्टद्वारे दिला इशारा

Nikki Tamboli | मराठी बिग बॉसमध्ये अरबाज आणि निक्की तांबोळी यांची जोडी चांगलीच चर्चेत राहिली होती. त्यांच्या नात्याबद्दल अनेकदा सोशल मिडियावर चर्चा रंगल्या आहेत. त्यानंतर सध्या रिअॅलिटी शो ‘राईज अँड फॉल’मध्ये अरबाज पाहायला मिळत आहे. या शोमध्ये आता अरबाजची क्रिकेटर युजवेंद्र चहलची पत्नी म्हणजेच धनश्री वर्मासोबत जवळीक वाढलेली पहायला मिळत आहे. अरबाज धनश्रीबाबत वारंवार पझेसिव्ह होताना दिसत आहे.
दरम्यान, धनश्री वर्मा आता चहलसोबत राहत नसून दोघांचा घटस्फोट झाला आहे. यावेळी धनश्री इतर स्पर्धकांना भेटताना मिठी मारते, तेव्हा अरबाजला ते अजिबात पटत नाही. त्यामुळे तो तिला याबाबत प्रश्न विचारताना दिसतो आणि त्यावरून त्यांच्या नात्यातील रंगत शोमध्ये अधिक ठळकपणे दिसून येते. यावर धनश्री म्हणते, ‘ही माझी पद्धत आहे. मी सगळ्यांची गळाभेट घेते.’ यावरून आता अरबाजने निकीला धोका दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मात्र आता निकी तांबोळीने तिच्या सोशल मिडियाच्या माध्यमातून या प्रकरणावर पोस्ट शेअर केली आहे. निकीने इन्स्टा स्टोरी ठेवत याप्रकरणी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आपल्या स्टोरीमध्ये निकी म्हणते, ‘अपना तो एकही उसूल है, यारी मे गद्दारी नही और गद्दारोंसे यारी नही.’ यानंतरही निकिने दुसरी स्टोरी शेअर केली आहे. त्यामध्ये ती म्हणते, ‘जब शिकार का समय होगा, जंगल मे हम खुद आयेंगे.’ यावरून निकीला अरबाजचे वागणे पटत नसल्याचा अंदाज नेटकऱ्यांकडून लावला जात आहे. Nikki Tamboli |
राइड एॅड फॉल या शोच्या पहिल्या दिवसापासून आदित्य नारायण, अरबाज पटेल आणि धनश्री वर्मा यांनी त्यांचा ग्रुप तयार केला. पवन सिंह सुद्धा त्याच्या ग्रुपचा भाग होता. परंतु आता तो शोमधून बाहेर झालाय. पवन सिंह गेल्यानंतर धनश्री आणि अरबाज यांच्यात जवळीक वाढली आहे. Nikki Tamboli |
हेही वाचा:
पाहणी दौऱ्यासाठी पोहचले अन् माघारी फिरले! सदाभाऊ खोत यांना शेतकऱ्यांनी घातला गराडा; नेमकं काय घडलं?




