Ranvir Shorey : …तर रस्त्यांवरील ‘झुरळांचे’ ऐकले जाईल; प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर रणवीर शौरी सरकारच्या समर्थनार्थ बोलला
Ranvir Shorey : अशातच विद्यार्थी आंदोलनावर प्रसिद्ध अभिनेता रणवीर शौरी याने दिलेल्या प्रतिक्रियेमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Ranvir Shorey : २५ जुलै रोजी धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिला. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यी आंदोलनाचे हे सर्वात मोठं यश आहे. कॅाक्रोच जनता पार्टीने पुकारलेल्या या लढ्याला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. अनेक मोठ्या व्यक्तींनी अभिजीत दिपके आणि सोनम वांगचुक यांना पाठिंबा दिला. मनोरंजन विश्वातून देखील तरुणांच्या आंदोलनाला साद मिळाली. अनेक कलाकार तर आंदोलनात सहभागी झाल्याचे बघायला मिळाले. प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आंदोलन थांबण्यात आले आहे. अशातच विद्यार्थी आंदोलनावर प्रसिद्ध अभिनेता रणवीर शौरी याने दिलेल्या प्रतिक्रियेमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
खरंतर रणवीर शौरीने अनेकदा या आंदोलनावर सोशल मीडिया प्लॅटफॅार्म एक्सवरुन पोस्ट करत आपलं मत मांडलं आहे. आता रणवीरने केलेले ट्वीट चर्चेत असून त्याची भूमिका बुचकाळ्यात टाकणारी असल्याची चर्चा रंगली आहे. रणवीर शौरीने ‘एक्स’ ‘जीआयएफ’ द्वारे आपले आश्चर्य व्यक्त केले. टाळ्या वाजवणाऱ्या इमोजीसह त्याने लिहिले, “आणि एका फटक्यात, मोदी सरकारने कदाचित आपल्या शत्रूंना जिंकले नसेल, पण आपल्या अनेक समर्थकांना मात्र नक्कीच दुरावले आहे. #Masterstroke” असे म्हटलं आहे.
Resignation before protests = Righteousness/Listening to supporters
Resignation after protests = Cowardice/Giving in to haters
The handling of this matter by the govt has been a complete shit show!
Some posts will be deleted, and will think twice before defending this govt… https://t.co/W9yZTPQndd
— Ranvir Shorey (@RanvirShorey) July 26, 2026
…तर रस्त्यांवरील ‘झुरळांचे’ ऐकले जाईल
नीट पेपरफुटी प्रकरणी प्रधान यांनी राजीनामा द्यायला हवा होता का, असे विचारले असता, शौरीने स्पष्ट केले की, राजीनामा आवश्यक होता, पण आंदोलने वाढण्यापूर्वीच तो द्यायला हवा होता. पुढे तो म्हणाला “हो, पण रस्त्यांवरील परिस्थिती इतकी बिघडण्यापूर्वीच हे करायला हवे होते. आता असे दिसते की समर्थकांचे ऐकले जाणार नाही, तर रस्त्यांवरील ‘झुरळांचे’ ऐकले जाईल.
….आणि या सरकारचा बचाव करण्यापूर्वी मी दोनदा विचार करेन
“एका वापरकर्त्याने लिहिले, “नेहमीच समर्थक आणि व्होट बँकेचाच प्रश्न असतो का? आपली चूक मान्य करणे म्हणजे भित्रेपणा नव्हे. प्रधान यांनी खूप पूर्वीच स्वेच्छेने राजीनामा द्यायला हवा होता.” यावर अभिनेत्याने म्हटले, “आंदोलनांपूर्वी राजीनामा देणे = योग्य गोष्ट करणे/समर्थकांचे ऐकणे. आंदोलनांनंतर राजीनामा देणे = भित्रेपणा/विरोधकांपुढे शरणागती पत्करणे. सरकारने हे प्रकरण अत्यंत वाईट पद्धतीने हाताळले आहे. काही पोस्ट्स हटवल्या जातील, आणि या सरकारचा बचाव करण्यापूर्वी मी दोनदा विचार करेन.”
अनेक कलाकारांनी दर्शवला पाठिंबा
त्यामुळे अभिनेत्याची भूमिका काहीशी गोंधळात टाकणारी आहे. दरम्यान, बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी या आंदोलनाला ऑनलाइन आणि प्रत्यक्ष अशा दोन्ही प्रकारे उघड पाठिंबा दर्शविला आहे. प्रकाश राज, शबाना आझमी आणि हनुमॅनकाइंड यांनी दिल्लीतील आंदोलनात सहभाग घेतला, तर काही कलाकार मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झाले होते.





