Rohit Pawar : .”…तर ते हुकुमशाहीचे लक्षण म्हणावे लागेल”; मराठा आरक्षणावरून रोहित पवारांचा सरकावर घणाघात

Rohit Pawar : मनोज जरांगे यांच्यासह हजारोंच्या संख्येने मराठा समाजातील आंदोलक बांधव मुंबईच्या आझाद मैदानावर दाखल झाले आहेत. या आंदोलनस्थळी जय्यत तयारी करण्यात आली आहे. मराठा समाजाचे प्रणते मनोज जरांने यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षण मिळावे या आग्रही मागणीसाठी आंदोलन पुकारलं आहे. ते आपल्या मागणीवर ठाम असून आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही, असा निर्धार त्यांनी आझाद मैदानावरून केला आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक्स पोस्टवरून सरकारवर घणाघात केला आहे.
आंदोलनस्थळी आंदोलकांना सुविधा उपलब्ध करून द्यायच्या असतात आणि हेच लोकशाहीचे खरे तत्व आहे, परंतु राज्य सरकार आंदोलकांची गैरसोय कशी होईल याचे नियोजन करत असेल तर ते हुकुमशाहीचे लक्षण म्हणावे लागेल, अशी घणाघाती टीका रोहित पवारांनी राज्य सरकारवर केली आहे.
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खाऊगल्ल्या बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यावर रोहित पवार म्हणाले मुंबईतील खाऊ गल्ल्या बंद ठेवण्याचे अलिखित फतवे गृहविभागाने काढल्याचे समोर येत आहे. खाऊगल्ल्यांना बंद ठेवण्यामागे गृहविभगाचा हेतू काय? असा सवाल त्यांनी केला आहे.
आंदोलनस्थळी आंदोलकांना सुविधा उपलब्ध करून द्यायच्या असतात आणि हेच लोकशाहीचे खरे तत्व आहे, परंतु राज्य सरकार आंदोलकांची गैरसोय कशी होईल याचे नियोजन करत असेल तर ते हुकुमशाहीचे लक्षण म्हणावे लागेल.
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खाऊगल्ल्या बंद ठेवण्याचे अलिखित फतवे गृहविभागाने… pic.twitter.com/dBB9D5V8py
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 29, 2025
मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असेल तर उलट खाऊगल्ल्या सुरु ठेवायला हव्यात. गृहविभागाने आपले अलिखित फतवे मागे घेऊन तत्काळ खाऊगल्ल्या सुरु करण्यासंदर्भात सूचना कराव्यात. तसेच आंदोलकांची मोठ्या प्रमाणात असलेली संख्या बघता आझाद मैदानावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे यासारख्या कोणत्याच मुलभूत सुविधा सरकारने उपलब्ध करुन दिलेल्या नाहीत, त्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी रोहित पवारांनी त्यांच्या एक्स पोस्टमधून केली आहे.
या-ना त्या मार्गाने दगाफटका करण्याचा डाव सरकार आखत असेल तर सरकार मोठी चूक करत आहे, हे गृहमंत्र्यांनी विसरू नये. गृहमंत्री हुशार आहेत, सरकारकडून दुसऱ्यांदा चूक होऊ देणार नाहीत, ही अपेक्षा! असं देखील रोहित पवारांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
हेही वाचा : आज निवडणुका झाल्या तर सत्तेत कोण येणार भाजप कि काँग्रेस? ; सर्वेक्षणातून खळबळजनक माहिती समोर





