Ashish Shelar : मुंबईवर दोन व्यापाऱ्यांचा डोळा आहे. आज एक जण येऊन गेला. असे म्हणत अॅनाकोंडा म्हणजे सर्व गिळणारा साप. तो येऊन गेला. त्यांना मुंबई गिळायचीय. पण त्यांना मुंबई कशी गिळू देतो बघतो. नाही तुझं पोट फाडून बाहेर आलो तर नावाचा नाही, असा थेट इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे नाव न घेता त्यांना दिला. ते शिवसेनेच्या वतीने आयोजित निर्धार मेळाव्यात बोलत होते. या टीकेवर आता भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी जशास तसे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शेलार यांनी एक्सवरून पोस्ट शेअर करत उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यातून अमित शाह यांचे नाव न घेता त्यांच्यावर झोंबणारी टीका केली होती. या टीकेला आशिष शेलारांनी प्रत्युत्तर देताना निर्धार मेळाव्याला लक्ष करत तीच रुदाली, तेच रडणे तीच मळमळ… त्याच उलट्या.. त्याच फुशारक्या.. आणि त्याच वायफाय शब्दांच्या कोट्या.. कट्ट, गट्ट, पट्ट सारखा पांचटपणा ही तोच… नाव “विजयाचा संकल्प” आणि बोलण्याला पराभवाचा दर्प !! अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांच्यावर केली. हेही वाचा: पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक – नोव्हेंबरमध्ये होणार आरक्षण सोडत नेमकं उद्धव ठाकरे काय म्हणाले? आगामी स्थानिक निवडणुका विशेष करून मुंबई मनपा निवडणुकीमुळे राजकारण तापले आहे. याच पार्श्वभूमीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निर्धार मिळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या निर्धार मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांनी आपल्या आक्रमक भाषणातून केंद्रीय मंत्री भाजप नेते अमित शाह यांचे थेट नाव न घेता त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. यावेळी ते म्हणाले, ” मुंबईवर दोन व्यापाऱ्यांचा डोळा आहे. आज एक जण येऊन गेला. सामनात दोन बातम्या पाहिल्या. पहिल्या पानावर बातमी होती, भाजप कार्यालयाचे भूमिपूजन. आत बातमी आहे. जिजामाता उद्यानात अॅनाकोंडा येणार. आपण पेंग्विन आणले. काही पेंग्विनच्या बुद्धीचे लोक आपल्यावर टीका करतात. ते सोडा. अॅनाकोंडा म्हणजे सर्व गिळणारा साप. तो येऊन गेला. त्यांना मुंबई गिळायचीय. पण त्यांना मुंबई कशी गिळू देतो बघतो. नाही तुझं पोट फाडून बाहेर आलो तर नावाचा नाही. या आक्रमक शैलीतून त्यांनी भाषणातून अमित शाह यांना लक्ष्य केले मा. केद्रीय मंत्री अमितभाई शाह हे मुंबईत येऊन गेले याची भिती आज निर्धार “मेळाव्याच्या चेहऱ्यावर” स्पष्ट दिसत होती. पराभवाची खात्री झालेय हे बोलण्यातून सतत डोकावत होते. एवढेच नवीन सोडले तर.. बाकी सगळे तेच ते आणि तेच ते.. तीच रुदाली, तेच रडणे तीच मळमळ… त्याच उलट्या.. त्याच… — Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 27, 2025 आशिष शेलार यांचे प्रत्युत्तर, काय म्हणाले? मा. केद्रीय मंत्री अमितभाई शाह हे मुंबईत येऊन गेले याची भिती आज निर्धार “मेळाव्याच्या चेहऱ्यावर” स्पष्ट दिसत होती. पराभवाची खात्री झालेय हे बोलण्यातून सतत डोकावत होते. एवढेच नवीन सोडले तर.. बाकी सगळे तेच ते आणि तेच ते.. तीच रुदाली, तेच रडणे तीच मळमळ… त्याच उलट्या.. त्याच फुशारक्या.. आणि त्याच वायफाय शब्दांच्या कोट्या.. कट्ट, गट्ट, पट्ट सारखा पांचटपणा ही तोच… नाव “विजयाचा संकल्प” आणि बोलण्याला पराभवाचा दर्प !! हेही वाचा : phaltan case: डॉ. संपदा मुंडे हिला न्याय दिला जाईल रुपाली चाकणकर; प्रसंगी तपासासाठी एसआयटी नेमणार